शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बँकेच्या चुकीच्या व्याज आकारणीमुळे पावणेतीनशे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:49 IST

कर्जमाफीची रक्कम व शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम यामध्ये तफावत येत आहे

कळंब (जि. उस्मानाबाद) : स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर चुकीचे व्याज आकारल्याने तालुक्यातील तब्बल पावणेतीनशे शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वंचित रहावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही चूक दुरुस्त करण्यासाठी आता यंत्रणा कामाला लागली असली तरी शासनाची ही महत्वाकांक्षी योजना ‘फसवी’ ठरविणाऱ्या यंत्रणावर काय कार्यवाही होणार? याकडे लक्ष लागले आहे.

कळंब येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेअंतर्गत दत्तक असणाऱ्या काही गावातील २७६ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये चुकीचे व्याज आकारल्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेमध्ये त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत. कर्जमाफीची रक्कम व शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम यामध्ये तफावत येत असल्याने या शेतकऱ्यांना शासनाच्या महत्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत शेतकऱ्यांनी बँकेकडे चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर बँकेकडे तसेच प्रशासनाकडे या शेतकऱ्यांनी दाद मागितली.

सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बँकेने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावरील व्याज कमी करुन हे शेतकरी योजनेस पात्र असल्याचे शासनास कळविले. त्यानंतर बँकेने जून २०१८ मध्ये या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यासाठी कागदपत्रेही जमा करुन घेतले. परंतु सहा महिन्यानंतरही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या २७६ शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले नाही. परिणामी शेतात उत्पन्न नाही, बँका कर्ज देत नाहीत या कात्रीत हे शेतकरी सापडले आहेत. 

दरम्यान, कर्जमाफी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. बँकेच्या चुकीचा फटका बसल्याने हे सर्व शेतकरी कर्जमाफीला तसेच नवीन कर्ज प्राप्तीला मुकल्याचे या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळविले. ही कर्जमाफीची प्रक्रिया त्वरीत करावी अन्यथा आत्मदहन करु, असा निर्वाणीचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.

तांत्रीक चुकीमुळे गोंधळ शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज रकमेत पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी नजरचुकीने जास्त रक्कम टाकल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. ती चूक दुरुस्त करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रशासनाकडे पाठविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण होईल व संबंधितांना याचा लाभ होईल, अशी माहिती कळंबच्या स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक काळे यांनी दिली.

तर तीव्र आंदोलन छेडूएकीकडे शासन कर्जमाफी झाली असे सांगत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी प्रशासनाकडे खेटे मारावे लागत आहेत. बँकेने चुकीचे व्याज माथी मारल्याने २७६ शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित रहावे लागले. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. या २७६ शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून त्यांना नवीन कर्ज त्वरीत वाटप करावे, अन्यथा या सर्व शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन हाती घेऊ, असा इशारा काँग्रेस (आय) चे जिल्हा सरचिटणीस भागवत धस यांनी दिला आहे.

इतर बँकातही तपासणीची गरज!कळंब येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एका शाखेत कर्जमाफीपासून वंचित राहिलेले २७६ शेतकरी समोर आले आहेत. तालुक्यात कळंब शहरासह मंगरुळ, येरमाळा, आंदोरा या गावात राष्ट्रीयकृत तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकाच्या शाखा आहेत. ढोकी, मुरुमड या ठिकाणच्या राष्ट्रीयकृत बँकेलाही कळंब तालुक्यातील काही गावे दत्तक आहेत. तेथेही हा प्रकार झाला का? याची खातरजमा करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाState Governmentराज्य सरकार