शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

ई-पीक पाहणीच्या हायटेक प्रणालीमुळे शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:40 IST

कळंब : पीक पाहणीत अचूकता यावी, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग रहावा या उद्देशाने ‘ई पीक पाहणी’ हा उपक्रम हाती ...

कळंब : पीक पाहणीत अचूकता यावी, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग रहावा या उद्देशाने ‘ई पीक पाहणी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी एकीकडे तलाठी शेतकऱ्यांकडे अट्टाहास ठरत असले तरी संबंधित हायटेक प्रणाली मात्र ‘प्रॉपर’ काम करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीचा प्रयोग सध्या तरी ‘रात्र थोडी, सोंगे फार’ या उक्तीप्रमाणे दिसून येत आहे.

जमीनधारक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा व वहिवाटीचा दाखला असलेल्या सातबारा उताऱ्यावरील ‘नमुना नंबर १२’ वर खरीप हंगामातील पिकांची नोंद घेतली जाते. आजवर हे काम गावपातळीवरचे तलाठी करत असत. मात्र, इतर कामाचा व्याप वाढलेल्या तलाठी साहेबांवरील हा ‘लोड’ कमी करून यात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ‘ई पीक पाहणी’ हा नवा हायटेक प्रयोग समोर आला. पीक पाहणीत अचूकता, पारदर्शकता व शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असावा, या उद्देशाची जोड देत यासंबंधीच्या कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला गेला. यानुसार आगामी १५ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये खरीप हंगामात उभ्या असलेल्या पिकांची नोंद अक्षांश अन् रेखांशातील छायाचित्रासह करणे बंधनकारक केले आहे.

यासाठी स्मार्ट मोबाईलवर एक ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, मागच्या आठ दिवसांत ना यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत, ना पुढाकार घेतलेल्या शेतकऱ्यांचा अन् यासाठी कार्यान्वित केलेल्या ॲपचा ताळमेळ लागत आहे. यामुळे एकीकडे वरिष्ठ गावपातळीवरच्या तलाठी यांना आकडा वाढला पाहिजे यासाठी आग्रह करत आहेत तर तलाठी शेतकऱ्यांकडे ‘ई पीक पाहणी कराच’ असा अट्टाहास करत असताना हजारो शेतकरी यापासून दूरच आहेत.

चौकट...

शेतकरी ६४ हजार, ई पीक पाहणी आठ हजारांवर

कळंब तालुक्यात एकूण ६४ हजार शेतकरी आहेत. यापैकी मागच्या दहा दिवसात केवळ आठ हजारांवर शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी केली आहे. यासाठीही तलाठी यांना शेतकऱ्यांकडे मोठी विनवणी करावी लागली आहे. त्यात कळंब मंडळात १ हजार ४९, ईटकूर १ हजार २१, मस्सा २ हजार ८८, येरमाळा ८५५, शिराढोण ९८७, नायगाव ८९९, मोहा १ हजार १५१, गोविंदपूर १ हजार २०५ याप्रमाणे शेतकऱ्यांनी गुरुवारपर्यंत ई पीक पाहणी केली आहे.

रात्र थोडी, सोंगे फार...

ई पीक पाहणी उपक्रमांतर्गत पिकाची माहिती अपलोड करण्यासाठी अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. यास ५ दिवसांचा कालावधी उरला आहे. असे असताना पन्नास हजार शेतकरी यापासून दूर आहेत. यामुळे हा उपक्रम ‘रात्र थोडी, सोंगे फार’ ठरत आहे. यास्थितीत बाबासाहेब कोठावळे, भिमा हगारे, राम कोठावळे, अशोस जगताप, आकाश वाघमारे, मनोज शिंदे, सौरभ मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन यास मुदतवाढ देण्याची मागणीदेखील केली आहे.