शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2023 20:30 IST

या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुळजापूर (जि. धाराशिव) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून चिंचोली येथील एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी विजयकुमार शहाजीराव पाटील (६२) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे फारसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तर दुसरीकडे बॅंकेकडून घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगरही वाढत चालला होता. शेतीतून उत्पादनच निघत नसल्याने बॅंकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याच विवंचनेत ते नेहमी असायचे. 

दरम्यान, ४ मे रोजी सकाळी १० वजण्याच्या सुमारास ते घराबाहेर पडले असता, परत आलेच नाही. यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शाेध घेतला. परंतु, त्यांचा काही तपास लागला नाही. असे असतानाच दोन दिवसानंतर ६ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महादेव पाटील यांच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळून आले. यानंतर भाऊसाहेब पाटील यांनी तातडीने घटनेची माहिती तुळजापूर पोलीस ठाण्यास दिली. पोहेकॉ. अतुल यादव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यानंतर तुळजापूर ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

४ लाखांचे पीक कर्ज...मयत विजयकुमार शहाजीराव पाटील यांनी आपल्या शेतीवर एका खाजगी बॅंकेकडून सुमारे ४ लाख रूपयांचे सामायिक पीक कर्ज घेतले हाेते. सततच्या नापिकीमुळे या कर्जाची परतफेड होत नव्हती. त्यामुळे वर्षागणिक पीक कर्जाचा डोंगरही वाढत चालला होता. याच विवंचनेतून त्यांनी टाेकाचे पाऊल उचलले, असे नातेवाईकांनी माध्यमांना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी