शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2023 20:30 IST

या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुळजापूर (जि. धाराशिव) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून चिंचोली येथील एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी विजयकुमार शहाजीराव पाटील (६२) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे फारसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तर दुसरीकडे बॅंकेकडून घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगरही वाढत चालला होता. शेतीतून उत्पादनच निघत नसल्याने बॅंकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याच विवंचनेत ते नेहमी असायचे. 

दरम्यान, ४ मे रोजी सकाळी १० वजण्याच्या सुमारास ते घराबाहेर पडले असता, परत आलेच नाही. यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शाेध घेतला. परंतु, त्यांचा काही तपास लागला नाही. असे असतानाच दोन दिवसानंतर ६ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महादेव पाटील यांच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळून आले. यानंतर भाऊसाहेब पाटील यांनी तातडीने घटनेची माहिती तुळजापूर पोलीस ठाण्यास दिली. पोहेकॉ. अतुल यादव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यानंतर तुळजापूर ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

४ लाखांचे पीक कर्ज...मयत विजयकुमार शहाजीराव पाटील यांनी आपल्या शेतीवर एका खाजगी बॅंकेकडून सुमारे ४ लाख रूपयांचे सामायिक पीक कर्ज घेतले हाेते. सततच्या नापिकीमुळे या कर्जाची परतफेड होत नव्हती. त्यामुळे वर्षागणिक पीक कर्जाचा डोंगरही वाढत चालला होता. याच विवंचनेतून त्यांनी टाेकाचे पाऊल उचलले, असे नातेवाईकांनी माध्यमांना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी