शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2023 20:30 IST

या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुळजापूर (जि. धाराशिव) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून चिंचोली येथील एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी विजयकुमार शहाजीराव पाटील (६२) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे फारसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तर दुसरीकडे बॅंकेकडून घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगरही वाढत चालला होता. शेतीतून उत्पादनच निघत नसल्याने बॅंकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याच विवंचनेत ते नेहमी असायचे. 

दरम्यान, ४ मे रोजी सकाळी १० वजण्याच्या सुमारास ते घराबाहेर पडले असता, परत आलेच नाही. यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शाेध घेतला. परंतु, त्यांचा काही तपास लागला नाही. असे असतानाच दोन दिवसानंतर ६ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महादेव पाटील यांच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळून आले. यानंतर भाऊसाहेब पाटील यांनी तातडीने घटनेची माहिती तुळजापूर पोलीस ठाण्यास दिली. पोहेकॉ. अतुल यादव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यानंतर तुळजापूर ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

४ लाखांचे पीक कर्ज...मयत विजयकुमार शहाजीराव पाटील यांनी आपल्या शेतीवर एका खाजगी बॅंकेकडून सुमारे ४ लाख रूपयांचे सामायिक पीक कर्ज घेतले हाेते. सततच्या नापिकीमुळे या कर्जाची परतफेड होत नव्हती. त्यामुळे वर्षागणिक पीक कर्जाचा डोंगरही वाढत चालला होता. याच विवंचनेतून त्यांनी टाेकाचे पाऊल उचलले, असे नातेवाईकांनी माध्यमांना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी