शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटवाडीतील शेतरस्ता शेतकऱ्यांसाठी झाला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

जेवळी : तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ) येथील काही शेतकऱ्यांनी शेतरस्ता अडविल्याने इतर शेतकऱ्यांना शेतीला जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा ...

जेवळी : तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ) येथील काही शेतकऱ्यांनी शेतरस्ता अडविल्याने इतर शेतकऱ्यांना शेतीला जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वैतागलेल्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सामंजस्यपणाची भूमिका घेत, शेतरस्ता खुला करण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जळकोटवाडी (नळ) येथील शेतकऱ्यांनी शेतरस्ता अडवणूकप्रकरणी तुळजापूर तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. तहसीलदारांनी जळकोट येथील मंडळ अधिकारी यांना लेखी आदेश दिल्यानंतर, मंडळ अधिकारी यांनी तलाठी यांच्यासह गावातील पंचांच्या सहकार्याने या शेतरस्त्याची पाहणी केली. यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या संमतीनुसार शेतरस्ता तयार केला. असे असतानाही काही मोजक्या शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवून ठेवला असल्याने, शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून सामंजस्यपणाने हा शेतरस्ता आता खुला करण्यात आला आहे.

यावेळी जळकोटचे मंडळ अधिकारी पी.एस. भोकरे, तलाठी तात्यासाहेब रूपनवर, कर्मचारी अशोक दूधभाते, सरपंच शिवाजी कदम, पोलीस पाटील देविदास वागदरे, शिवाजी वागदरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी या रस्त्यावरील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.