शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

जनतेला फसविणारे फडणवीस सरकार ‘क्लीन चिटर’; अशोकराव चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:20 IST

पिकांवर फवारणी करताना यवतमाळमध्ये चाळीस शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीतही वेळोवेळी हाच अनुभव आल्याचे सांगत जनतेला फसविणारे फडणवीस सरकार हे ‘क्लीन चिटर’ असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. 

उस्मानाबाद : पिकांवर फवारणी करताना यवतमाळमध्ये चाळीस शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीतही वेळोवेळी हाच अनुभव आल्याचे सांगत जनतेला फसविणारे फडणवीस सरकार हे ‘क्लीन चिटर’ असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. 

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरानिमित्त सोमवारी तुळजापूर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकरराव चव्हाण, तुकाराम रेंगे, पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. चव्हाण म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील सुमारे साडेतेरा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यापैकी २ हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीच्या घोषणेनंतर मृत्युला कवटाळले. याला कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

सरकारकडे सरसकट कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. मग जाहिरातींच्या माध्यमातून प्रचार-प्रसिद्धीवर खर्च करण्यासाठी कोट्यवधी रूपये आले कुठून, असा सवाल करीत शेतकर्‍यांप्रती सरकारच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. फडणवीस सरकार जनतेच्या पैशाची अक्षरश: उधळपट्टी करीत आहेत. काल-परवाच २२५ ‘व्हीआयपी’ वाहने खरेदीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक वाहन तर ‘बुलेटप्रुफ’ असून ज्याची किंमत ५६ लाख रूपये असल्याचे सांगत हा निर्णय देखील जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीचाच भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप झाले. काही प्रकरणांत समिती गठित करून चौकशीचा फार्स केला. परंतु, प्रत्येकवेळी संबंधित मंत्र्यांना ‘क्लिनचिट’ देण्याचे काम झाले. यवतमाळमध्ये पिकांवर किटकनाशकांची फवारणी करताना चाळीस शेतकर्‍यांचा जीव गेला. चोहोबाजुंनी टिकेची झोड उठल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली, आणि या समितीने सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. त्यामुळे फडणवीस सरकार हे जनतेला फसविणारे ‘क्लीन चिटर’ असाल्याचा घणाघात त्यांनी केला. यावेळी त्यांनी आरक्षण, मॅग्नेटिक महाराष्ट्र, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदी मुद्यावरूनही भाजप सरकारला त्यांनी ‘लक्ष्य’ केले.

३१३ कोटीच्या मदतीने काय होणार?मराठवाड्यासह राज्याच्या अन्य भागात झालेल्या गारपीटीमुळे रबी पिकांसोबतच फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. विशेषत: द्राक्ष उत्पादक शेतकरी मोडून पडला आहे. अशावेळी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत देवून आधार देण्याची गरज होती. परंतु, फडणवीस सरकारने ३१३ कोटी रूपये एवढी तुटपुंजी मदत जाहीर करून गारपीटग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोपही खा. चव्हाण यांनी केला.

आघाडीचा अंतिम निर्णय राहुल गांधी घेतीलआगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा प्रश्न खा. चव्हाण यांना केला असता, आघाडी करावी की करू नये, या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. त्याचा अहवाल तयार करून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला जाईल, आणि अंतिम निर्णयही तेच घेतील, अशी माहिती खा. चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादAshok Chavanअशोक चव्हाण