शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

जनतेला फसविणारे फडणवीस सरकार ‘क्लीन चिटर’; अशोकराव चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:20 IST

पिकांवर फवारणी करताना यवतमाळमध्ये चाळीस शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीतही वेळोवेळी हाच अनुभव आल्याचे सांगत जनतेला फसविणारे फडणवीस सरकार हे ‘क्लीन चिटर’ असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. 

उस्मानाबाद : पिकांवर फवारणी करताना यवतमाळमध्ये चाळीस शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीतही वेळोवेळी हाच अनुभव आल्याचे सांगत जनतेला फसविणारे फडणवीस सरकार हे ‘क्लीन चिटर’ असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. 

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरानिमित्त सोमवारी तुळजापूर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकरराव चव्हाण, तुकाराम रेंगे, पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. चव्हाण म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील सुमारे साडेतेरा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यापैकी २ हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीच्या घोषणेनंतर मृत्युला कवटाळले. याला कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

सरकारकडे सरसकट कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. मग जाहिरातींच्या माध्यमातून प्रचार-प्रसिद्धीवर खर्च करण्यासाठी कोट्यवधी रूपये आले कुठून, असा सवाल करीत शेतकर्‍यांप्रती सरकारच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. फडणवीस सरकार जनतेच्या पैशाची अक्षरश: उधळपट्टी करीत आहेत. काल-परवाच २२५ ‘व्हीआयपी’ वाहने खरेदीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक वाहन तर ‘बुलेटप्रुफ’ असून ज्याची किंमत ५६ लाख रूपये असल्याचे सांगत हा निर्णय देखील जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीचाच भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप झाले. काही प्रकरणांत समिती गठित करून चौकशीचा फार्स केला. परंतु, प्रत्येकवेळी संबंधित मंत्र्यांना ‘क्लिनचिट’ देण्याचे काम झाले. यवतमाळमध्ये पिकांवर किटकनाशकांची फवारणी करताना चाळीस शेतकर्‍यांचा जीव गेला. चोहोबाजुंनी टिकेची झोड उठल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली, आणि या समितीने सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. त्यामुळे फडणवीस सरकार हे जनतेला फसविणारे ‘क्लीन चिटर’ असाल्याचा घणाघात त्यांनी केला. यावेळी त्यांनी आरक्षण, मॅग्नेटिक महाराष्ट्र, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदी मुद्यावरूनही भाजप सरकारला त्यांनी ‘लक्ष्य’ केले.

३१३ कोटीच्या मदतीने काय होणार?मराठवाड्यासह राज्याच्या अन्य भागात झालेल्या गारपीटीमुळे रबी पिकांसोबतच फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. विशेषत: द्राक्ष उत्पादक शेतकरी मोडून पडला आहे. अशावेळी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत देवून आधार देण्याची गरज होती. परंतु, फडणवीस सरकारने ३१३ कोटी रूपये एवढी तुटपुंजी मदत जाहीर करून गारपीटग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोपही खा. चव्हाण यांनी केला.

आघाडीचा अंतिम निर्णय राहुल गांधी घेतीलआगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा प्रश्न खा. चव्हाण यांना केला असता, आघाडी करावी की करू नये, या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. त्याचा अहवाल तयार करून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला जाईल, आणि अंतिम निर्णयही तेच घेतील, अशी माहिती खा. चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादAshok Chavanअशोक चव्हाण