शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

'शिवभोजन'च्या अटीत राहिल्या त्रुटी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 15:11 IST

सर्वच थाळी खरोखरच्या गरजू असलेल्या लोकांनाच मिळण्याची शक्यता कमी होत चालली आहे.

उस्मानाबाद : शासनाने २६ जानेवारीपासून सुरु केलेल्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे सोमवारी काही सरकारी कर्मचारी, पांढरपेशा लोकही १० रुपयांत थाळीचा आस्वाद घेताना दिसून आले. बसस्थानकात तर पहिल्या तासाभरातच मंजूर थाळी संपून गेल्या. उस्मानाबाद शहरातील तीन हॉटेलमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. बसस्थानकातील कँटीन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कॅटीन व स्थानकाजवळील फ्रेंड्स हॉटेलला परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कॅटीनला प्रत्येकी ९० तर फ्रेंड्स हॉटेलला ८० थाळ्यांची परवानगी असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बसस्थानकातील कँटीन हे वर्दळीचे ठिकाण असल्याने याठिकाणी योजनेतून आहार घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी विद्यार्थी तसेच बरेचसे ग्रामीण भागातून आलेले लोक भोजनाचा आस्वाद घेताना १२.३० वाजता दिसून आले. एकाच वेळी जवळपास ४० व्यक्ती बसून जेवण घेण्याची क्षमता येथे असल्याने पहिल्या तासाभरातच मंजूर थाळ्या संपून जात आहेत. यानंतर प्रशासकीय इमारतीतील कँटीनमध्ये पाहिले असता, याठिकाणी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता व अन्नपदार्थांची दर्जा चांगला दिसत होता. मात्र गरीब, गरजूंपेक्षा आर्थिक क्षमता बरी असणाऱ्यांची संख्या जास्त दिसून येत होती. काही सरकारी कर्मचाऱ्यांनाही या भोजनाचा आस्वाद घेतला.

तर १ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी असलेल्या रजिस्टरमध्ये २७ जणांची नोंद झालेली होती. दरम्यान, सायंकाळी पुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता, सर्वच मंजूर थाळीचा लाभ सोमवारी तिन्ही हॉटेलमध्ये नागरिकांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी अजूनही राहिलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे सर्वच थाळी खरोखरच्या गरजू असलेल्या लोकांनाच मिळण्याची शक्यता कमी होत चालली आहे. तरीही हॉटेलचालक व आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनीही नैतिकता बाळगल्यास ही योजना गरीबांसाठी चांगली ठरणार आहे.

काय आहे योजनेत त्रुटी

हॉटेलचालक ग्राहक आल्यानंतर त्यांचे नाव, गाव, मोबाईल क्रमांक नोंदवून घेत त्यांचा फोटो अॅपमध्ये अपलोड करतात. मात्र, तो चांगली आर्थिक क्षमता असलेला आहे किंवा नाही, सरकारी अधिकारी, कर्मचारी आहे किंवा नाही, हे त्यास ओळखता येणार नाही. त्यामुळे सर्वच थाळ्या गरजूंनाच गेल्या, हेही स्पष्टपणे सांगता येणार नाही. शिवाय, अॅपमध्ये फोटो अपलोड झाला की, संबंधिताने भोजन घेतले, असे गृहीत धरले जाते. यात गैरप्रकाराला वाव आहे. असे असले तरी हॉटेलचालक व नागरिकांनी नैतिकता पाळल्यास ही योजना गरजूंसाठी चांगलीच असल्याचे आढळून आले.

अशी आहे प्रक्रिया..

  • शिवभोजन योजनेचा शहरातील नेमून दिलेल्या तीन हॉटेलमध्येच लाभ घेता येतो. याठिकाणी दुपारी १२ ते २ या वेळेत जाऊन समोरच असलेल्या शिवभोजन काऊंटरवर १0 रुपये भरावे लागतील.
  • त्यानंतर हॉटेलचालक या योजनेच्या अॅपमध्ये जावून लाभार्थ्याचा फोटो अपलोड करतो. तेथील रजिस्टरमध्ये लाभार्थ्याने आपले नाव, गाव, मोबाइल क्रमांक भरुन स्वाक्षरी केली की लगेचच त्यांना थाळीचा आस्वाद घेता येणार आहे.
  • सुरुवातीला विरोधकांनी गवगवा केल्याप्रमाणे लाभ घेण्यासाठीच्या प्रक्रियेत फारशी अडचण नाही. सोपी, सुटसुटीत ही प्रक्रिया दिसून आली.