शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'शिवभोजन'च्या अटीत राहिल्या त्रुटी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 15:11 IST

सर्वच थाळी खरोखरच्या गरजू असलेल्या लोकांनाच मिळण्याची शक्यता कमी होत चालली आहे.

उस्मानाबाद : शासनाने २६ जानेवारीपासून सुरु केलेल्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे सोमवारी काही सरकारी कर्मचारी, पांढरपेशा लोकही १० रुपयांत थाळीचा आस्वाद घेताना दिसून आले. बसस्थानकात तर पहिल्या तासाभरातच मंजूर थाळी संपून गेल्या. उस्मानाबाद शहरातील तीन हॉटेलमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. बसस्थानकातील कँटीन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कॅटीन व स्थानकाजवळील फ्रेंड्स हॉटेलला परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कॅटीनला प्रत्येकी ९० तर फ्रेंड्स हॉटेलला ८० थाळ्यांची परवानगी असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बसस्थानकातील कँटीन हे वर्दळीचे ठिकाण असल्याने याठिकाणी योजनेतून आहार घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी विद्यार्थी तसेच बरेचसे ग्रामीण भागातून आलेले लोक भोजनाचा आस्वाद घेताना १२.३० वाजता दिसून आले. एकाच वेळी जवळपास ४० व्यक्ती बसून जेवण घेण्याची क्षमता येथे असल्याने पहिल्या तासाभरातच मंजूर थाळ्या संपून जात आहेत. यानंतर प्रशासकीय इमारतीतील कँटीनमध्ये पाहिले असता, याठिकाणी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता व अन्नपदार्थांची दर्जा चांगला दिसत होता. मात्र गरीब, गरजूंपेक्षा आर्थिक क्षमता बरी असणाऱ्यांची संख्या जास्त दिसून येत होती. काही सरकारी कर्मचाऱ्यांनाही या भोजनाचा आस्वाद घेतला.

तर १ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी असलेल्या रजिस्टरमध्ये २७ जणांची नोंद झालेली होती. दरम्यान, सायंकाळी पुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता, सर्वच मंजूर थाळीचा लाभ सोमवारी तिन्ही हॉटेलमध्ये नागरिकांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी अजूनही राहिलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे सर्वच थाळी खरोखरच्या गरजू असलेल्या लोकांनाच मिळण्याची शक्यता कमी होत चालली आहे. तरीही हॉटेलचालक व आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनीही नैतिकता बाळगल्यास ही योजना गरीबांसाठी चांगली ठरणार आहे.

काय आहे योजनेत त्रुटी

हॉटेलचालक ग्राहक आल्यानंतर त्यांचे नाव, गाव, मोबाईल क्रमांक नोंदवून घेत त्यांचा फोटो अॅपमध्ये अपलोड करतात. मात्र, तो चांगली आर्थिक क्षमता असलेला आहे किंवा नाही, सरकारी अधिकारी, कर्मचारी आहे किंवा नाही, हे त्यास ओळखता येणार नाही. त्यामुळे सर्वच थाळ्या गरजूंनाच गेल्या, हेही स्पष्टपणे सांगता येणार नाही. शिवाय, अॅपमध्ये फोटो अपलोड झाला की, संबंधिताने भोजन घेतले, असे गृहीत धरले जाते. यात गैरप्रकाराला वाव आहे. असे असले तरी हॉटेलचालक व नागरिकांनी नैतिकता पाळल्यास ही योजना गरजूंसाठी चांगलीच असल्याचे आढळून आले.

अशी आहे प्रक्रिया..

  • शिवभोजन योजनेचा शहरातील नेमून दिलेल्या तीन हॉटेलमध्येच लाभ घेता येतो. याठिकाणी दुपारी १२ ते २ या वेळेत जाऊन समोरच असलेल्या शिवभोजन काऊंटरवर १0 रुपये भरावे लागतील.
  • त्यानंतर हॉटेलचालक या योजनेच्या अॅपमध्ये जावून लाभार्थ्याचा फोटो अपलोड करतो. तेथील रजिस्टरमध्ये लाभार्थ्याने आपले नाव, गाव, मोबाइल क्रमांक भरुन स्वाक्षरी केली की लगेचच त्यांना थाळीचा आस्वाद घेता येणार आहे.
  • सुरुवातीला विरोधकांनी गवगवा केल्याप्रमाणे लाभ घेण्यासाठीच्या प्रक्रियेत फारशी अडचण नाही. सोपी, सुटसुटीत ही प्रक्रिया दिसून आली.