शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
3
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
4
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
5
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
6
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
7
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
8
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
9
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
10
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
11
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
12
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
13
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
14
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
15
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
16
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
17
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
18
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
19
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
20
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
Daily Top 2Weekly Top 5

तांडा वस्ती सुधार याेजनेतून उस्मानाबादला डच्चू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST

उस्मानाबाद - तुळजापूर, उमरग्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. असे असतानाही वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार ...

उस्मानाबाद - तुळजापूर, उमरग्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. असे असतानाही वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजनेत उस्मानाबादचा समावेश करण्यात आलेला नाही. शासनाच्या या निर्णयामुळे बंजारा समाज बांधवांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्याचे शिष्टमंडळ मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहे.

मागासवर्गीय वस्ती विकास याेजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने तांड्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजना हाती घेण्यात आली. काॅंग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असताना ही याेजना संपूर्ण राज्यभरासाठी लागू हाेती. यानंतर राज्यात भाजपाची सत्ता आली. यानंतर त्यांनी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना करून प्रस्ताव राज्यस्तरावर मागविण्यास सुरूवात केली. यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने समितीचे अध्यक्षपद त्या-त्या मतदार संघाच्या आमदारांकडे दिले. दरम्यान, समितीचे अध्यक्षपद पूर्वीप्रमाणे बंजारा समाजातील व्यक्तीकडे असावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येत हाेता. या अनुषंगाने मंत्री वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतानाच दुसरीकडे या याेजनेत अवघ्या ११ जिल्ह्यांचाच समावेश केला आहे. त्यामुळे तांड्यांची लक्षणीय संख्या असलेल्या अन्य जिल्ह्यांचे काय, असा प्रश्न आता समाजबांधवांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. जे अकरा जिल्हे निवडले आहेत, त्यात बुलडाणा, यवतमाळ, नांदेड, जालना, परभणी, बीड, साेलापूर, औरंगाबाद, लातूर, हिंगाेली आणि वाशीमचा समावेश आहे. या अकरा जिल्ह्यांच्या यादीत १३१ तांडे असलेल्या उस्मानाबादचा समावेश मात्र करण्यात आलेला नाही. त्यामुळे या तांड्यांच्या विकासासाठी निधी आणायचा काेठून? असा प्रश्न आता बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील तांड्यांची संख्या लक्षात घेता, शासनाने या याेजनेसाठी निवडलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश करावा, अशी मागणी काँग्रेसचे महेश पाटील यांनी केली आहे.

चाैकट...

शिष्टमंडळ मुंबईला जाणार...

जिल्ह्यातील तुळजापूर, उस्मानाबाद, उमरगा, कळंब आदी तालुक्यांत मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. मात्र, तांडा वस्ती याेजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे तांड्यांवर विकासाची कामे करताना निधीचा प्रश्न भेडसावू शकताे. सदरील प्रश्न लक्षात घेऊन आम्ही मुंबई येथे जाऊन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहाेत, असे समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

कार्यालयास लेखी आदेश नाही...

तांडा वस्ती सुधार याेजनेतून उस्मानाबाद वगळल्याची कल्पना नाही. अथवा तसे लेखी पत्र शासनाकडून आमच्या कार्यालयास आलेले नाही, असे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब अरावत यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.