शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

तांडा वस्ती सुधार याेजनेतून उस्मानाबादला डच्चू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST

उस्मानाबाद - तुळजापूर, उमरग्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. असे असतानाही वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार ...

उस्मानाबाद - तुळजापूर, उमरग्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. असे असतानाही वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजनेत उस्मानाबादचा समावेश करण्यात आलेला नाही. शासनाच्या या निर्णयामुळे बंजारा समाज बांधवांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्याचे शिष्टमंडळ मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहे.

मागासवर्गीय वस्ती विकास याेजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने तांड्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजना हाती घेण्यात आली. काॅंग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असताना ही याेजना संपूर्ण राज्यभरासाठी लागू हाेती. यानंतर राज्यात भाजपाची सत्ता आली. यानंतर त्यांनी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना करून प्रस्ताव राज्यस्तरावर मागविण्यास सुरूवात केली. यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने समितीचे अध्यक्षपद त्या-त्या मतदार संघाच्या आमदारांकडे दिले. दरम्यान, समितीचे अध्यक्षपद पूर्वीप्रमाणे बंजारा समाजातील व्यक्तीकडे असावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येत हाेता. या अनुषंगाने मंत्री वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतानाच दुसरीकडे या याेजनेत अवघ्या ११ जिल्ह्यांचाच समावेश केला आहे. त्यामुळे तांड्यांची लक्षणीय संख्या असलेल्या अन्य जिल्ह्यांचे काय, असा प्रश्न आता समाजबांधवांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. जे अकरा जिल्हे निवडले आहेत, त्यात बुलडाणा, यवतमाळ, नांदेड, जालना, परभणी, बीड, साेलापूर, औरंगाबाद, लातूर, हिंगाेली आणि वाशीमचा समावेश आहे. या अकरा जिल्ह्यांच्या यादीत १३१ तांडे असलेल्या उस्मानाबादचा समावेश मात्र करण्यात आलेला नाही. त्यामुळे या तांड्यांच्या विकासासाठी निधी आणायचा काेठून? असा प्रश्न आता बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील तांड्यांची संख्या लक्षात घेता, शासनाने या याेजनेसाठी निवडलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश करावा, अशी मागणी काँग्रेसचे महेश पाटील यांनी केली आहे.

चाैकट...

शिष्टमंडळ मुंबईला जाणार...

जिल्ह्यातील तुळजापूर, उस्मानाबाद, उमरगा, कळंब आदी तालुक्यांत मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. मात्र, तांडा वस्ती याेजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे तांड्यांवर विकासाची कामे करताना निधीचा प्रश्न भेडसावू शकताे. सदरील प्रश्न लक्षात घेऊन आम्ही मुंबई येथे जाऊन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहाेत, असे समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

कार्यालयास लेखी आदेश नाही...

तांडा वस्ती सुधार याेजनेतून उस्मानाबाद वगळल्याची कल्पना नाही. अथवा तसे लेखी पत्र शासनाकडून आमच्या कार्यालयास आलेले नाही, असे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब अरावत यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.