शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थिनींचा पोलीस स्थानकावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:59 IST

विद्यार्थिनींना शाळेत जाताना मागील काही महिन्यांपासून रोडरोमिओंच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

येणेगूर (उस्मानाबाद) : रोडरोमिओंच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी बुधवारी सकाळी आठ वाजता येथील पोलीस दूरक्षेत्र व ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. 

उमरगा येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाताना मागील काही महिन्यांपासून रोडरोमिओंच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. असे असतानाच काही दिवसांपासून तर संबंधित तरूण दुचाकीवरून विद्यार्थिनींना कट मारून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रोडरोमिओंच्या या सततच्या त्रासाला वैतागलेल्या विद्यार्थिनींनी बुधवारी सकाळी येणेगूर पोलीस दूरक्षेत्रावर मोर्चा काढला. रोडरोमिओंचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यानंतर  पोहेकॉ. निवृत्ती बोळके व पोना दिगंबर सूर्यवंशी यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गोपनियरित्या चिठ्ठ्या टाकून त्रास देणाऱ्या टवाळखोरांची नावे देण्याबाबत पोलिसांनी विद्यार्थिनींना सांगितले असता, या माध्यमातून चार ते पाच टवाळखोरांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. संबंधित टवाळखोरांवर त्वरित करावाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.

यानंतर विद्यार्थिनींनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीकडे वळविला. या ठिकाणी उपसरपंच वैभव बिराजदार, बसवेश्वर माळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधाकर धामशेट्टी,  सदस्य अमोल स्वामी, सतीश मुदकण्णा यांनी विद्यार्थिनींचे निवेदन स्विकारले. थोडाही विलंब न करता, ग्रामपंचायतीने पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पत्र देऊन टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे विद्यार्थिनींसह पालकांचेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळाStudentविद्यार्थी