शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरड्या’मुळे गाव सोडले; ‘ओल्या’मुळे जीवन संपले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 17:38 IST

घर पंचगंगेच्या कव्हेत निपचित पडल्याचे दिसताच हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू

ठळक मुद्देपुरामुळे कदमवाडी येथील साळोखे कॉलनीतील छोटेखानी घर सोडावे लागले पुतणीचे होते उद्या लग्न

- बालाजी आडसूळ

कळंब  (जि. उस्मानाबाद): दुष्काळामुळे गाव सोडलं...कोल्हापूर शहरातील करवीर नगरीत श्रमातून स्वत:चे नव विश्व निर्माण केलं...हक्काच छोटेखानी घरटं बांधल... परंतु, डोळ्यादेखत घरसंसार पाण्याखाली गेला अन् होत्याचं नव्हतं झालं...कोरड्या दुष्काळाने गाव सोडलेल्या कुटूंबावर पूर परिस्थितीने घातलेल्या घावामुळे मुंकूद कोकाटे या इटकूरकराचा हृद्यविकाराच्या धक्क्याने अंत झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

कळंब तालुक्यातील इटकूर येथील बाबूराव कोकाटे यांना पाच मुले. हाती जेमतेम कोरडवाहू जमीन. यातच दुष्काळ पाचवीला पुजलेला. यामुळे कोकाटे कुंटूबाची उपजिविका भागवली जात नसल्याने त्यांनी थेट कोल्हापूर गाठले. आहे त्या अल्पभू जमिनीवर भागेल या हिशोबाने एक मुलगा गावात थांबला अन् बाकीचे चार भाऊ कोल्हापूरात श्रमजीवी म्हणून मिळेल ते काम करू लागले. यात कोणी पेंटीगच्या तर कोणी सेंट्रीगच्या कामातून स्थिरस्थावर होण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या भावंडापैकीच एक असलेल्या मुंकूद बाबूराव कोकाटे.  

मुंकूद यांनी कोल्हापूरात आपला जम बसवून कदमवाडी येथील साळोखे कॉलनीत छोटेखानी घरही बांधले होते. याठिकाणी आपला कामधंदा साभांळत मुंकूद यांचा सुखाचा संसार सुरू होता. पत्नी, एक मुलगा व तीन मुली अशा या परिवारासाठी पंचगंगेचा पूर मात्र होत्याचं नव्हतं करून गेला. पंचगंगेचे पाणी रस्त्यावरून घरात येत असतांना पुढे भयाण स्थिती ओढावेल याची पुसटशी कल्पनाही कोकाटे कुंटुबाला नव्हती. परंतु,नकळत दारातल्या पाण्याने घरात अन् घरातल्या पाण्याने छताला पार केले. घरासह संपूर्ण संसार पाण्यात बुडाला. धोक्याची पातळी वाढल्याने मग सुरक्षेसाठी अन्य ठिकाणचे नातेवाईकांचे घर गाठले. पाणी वाढतच असल्याने इथेही त्यांची घराची काळजी लागून राहिल्याने झोप उडाली होती. यातूनच शुक्रवारी पाय पुन्हा घराकडे वळले अन् पाहणीवेळी घर पंचगंगेच्या कव्हेत निपचित पडल्याचे दिसले. कष्टकरी असलेल्या मुंकूद यांच्या साठी हा मोठा धक्का होता. मोठ्या जड अंतकरणाने नातेवाईकांच्या घराकडे परतीचा प्रवास सुरू केला. परंतु, हा प्रवास त्यांच्या जीवनाचा अंतीम प्रवासच ठरला. धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

इटकूरवर शोककळा...कोकाटे कुटुंबाने इटकूर (ता.कळंब) येथील दुष्काळी स्थितीमुळे गाव सोडले होते. यानंतर मोठ्या कष्टाने कोल्हापूरात संसाराचा जम बसवला. परंतु, दुष्काळाने गाव सोडण्याची वेळ आलेल्या कोकाटे कुटुंबातील मुंकूद यांना कोल्हापूरातील ओल्या दुष्काळाने मात्र अचानक ‘एक्झिट’  घ्यावी लागली. यामुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरात पोटापाण्यासाठी स्थिरस्थावर झालेली इटकूर येथील अशी वीसपेक्षा जास्त कुंटूब आहेत.

पुतणीचे होते उद्या लग्न....मुंकूद यांच्या लगतच विनोद हा भाऊ राहत आहे. या भावाच्या मुलीचे रविवारी लग्नकार्य नियोजित होते. याची आवश्यक ती तयारी ही झाली होती. अचानक ओढवलेल्या  पूर परिस्थीतीमुळे हे कार्य नियोजन पुढे ढकलले होते. परंतु, यासाठी केलेली खरेदी व साहित्य पुराच्या तडाक्यात सापडले आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद