शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

घृणास्पद ! कोरोना निगेटिव्ह असतानाही वडिलांचा मृतदेह मुलाने नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:16 IST

शेवटी उस्मानाबाद पालिकेने केला अंत्यविधी

ठळक मुद्देवडिलांचा मृतदेह दवाखान्यातच ठेऊन मुलगा गायबअंत्यविधीसही झाला होता विरोध़

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीच्या मुलाने भितीपोटी मृतदेह तेथेच सोडून पोबारा केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे़ अंत्यविधीस कोणीही समोर येत नसल्याने अखेर पालिका कर्मचाऱ्यांनीच बुधवारी दुपारी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले़

कोरोनामुळे नात्यातील अन् मनामनातील अंतरही वाढीस लागल्याची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत़ वार्धक्याने जरी मृत्यू झाला तरी मयत व्यक्तीच्या अंत्यविधीला नाना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे़ विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाचा मोठाच धसका लोकांनी घेतला आहे़ त्याची झळ मयताच्या कुटूंबियांनाही सोसावी लागत आहे़ याचेच एक उदाहरण बुधवारी उस्मानाबादेतील घटनेवरुन समोर आले़ परंडा तालुक्यातील एका ७० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना परंडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथून पुढील उपचारासाठी त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले़ उपचार सुरु असताना या व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली़ त्याचा अहवाल निगेटीव्ह आला.

मात्र, त्या व्यक्तीने उपचारादरम्यानच दोन दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला़ उपचार सुरु असताना या व्यक्तीचा मुलगा त्यांच्यासोबतच होता़ मात्र, मृत्यू झाल्यानंतर त्याने मृतदेह रुग्णालयातच सोडून एकट्यानेच गाव गाठले़ गावाकडे अंत्यविधीस विरोध होईल, मृतदेह नेता येणार नाही, असे आगतिकपणे सांगून त्याने गुपचूप रुग्णालय सोडले़ मयताच्या कुटूंबियांशी संपर्क केल्यानंतरही त्यांनी मृतदेह स्विकारण्यास असमर्थतता दर्शविल्याने नाईलाजास्तव पोलिसांनी उस्मानाबाद पालिकेला अंत्यविधीसाठी आर्जव केले़ पालिका कर्मचाऱ्यांनी मग पुढाकार घेऊन मयतावर सार्वजनिक स्मशानभूमीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार केले़ या घटनमुळे कोरोनाने निर्माण केलेली भिती, अंधविश्वास अन् मनामनात निर्माण केलेली दरी अधोरेखित झाली आहे़ 

अंत्यविधीसही झाला होता विरोध़उस्मानाबाद पालिकेकडून बेवारस असलेल्या मृतदेहांवर वेळोवेळी अंत्यसंस्कार केले जातात़ यासाठी शहरालगतचीच एक शासकीय जागा निश्चित केलेली आहे़ त्यामुळे याहीवेळी नेहमीप्रमाणे या जागेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका कर्मचारी मृतदेह  घेऊन गेले़ मात्र, याच भूखंडावर वास्तव्य करुन राहिलेल्या काही नागरिकांनी असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करीत अंत्यविधीस विरोध केला़ परिणामी, तो मृतदेह घेऊन कर्मचारी सार्वजनिक स्मशानभूमीत गेले अन् तेथेच अंत्यविधी केला़ 

मानवतेची भूमिका घेतली पाहिजे़कोरोनामुळे आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही़ शिवाय, मृत्यू झाला तरी यंत्रणा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देत नाही़ त्यामुळे एखाद्या अन्य आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मरणोपरांत सामाजिक छळ होणे उचित नाही़ अशा प्रकारचे ‘सोशल डिस्टन्स’ मानवी मनाला यातना देते़ त्यामुळे कोणताही गैरसमज करुन घेऊन मृतदेह बेवारस सोडणे, अंत्यविधीस विरोध करणे योग्य नाही़ नागरिकांनी सांमजस्याची, मानवतेची भूमिका घेतली पाहिजे़- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद

टॅग्स :Deathमृत्यूOsmanabadउस्मानाबादhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या