शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

घृणास्पद ! कोरोना निगेटिव्ह असतानाही वडिलांचा मृतदेह मुलाने नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:16 IST

शेवटी उस्मानाबाद पालिकेने केला अंत्यविधी

ठळक मुद्देवडिलांचा मृतदेह दवाखान्यातच ठेऊन मुलगा गायबअंत्यविधीसही झाला होता विरोध़

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीच्या मुलाने भितीपोटी मृतदेह तेथेच सोडून पोबारा केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे़ अंत्यविधीस कोणीही समोर येत नसल्याने अखेर पालिका कर्मचाऱ्यांनीच बुधवारी दुपारी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले़

कोरोनामुळे नात्यातील अन् मनामनातील अंतरही वाढीस लागल्याची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत़ वार्धक्याने जरी मृत्यू झाला तरी मयत व्यक्तीच्या अंत्यविधीला नाना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे़ विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाचा मोठाच धसका लोकांनी घेतला आहे़ त्याची झळ मयताच्या कुटूंबियांनाही सोसावी लागत आहे़ याचेच एक उदाहरण बुधवारी उस्मानाबादेतील घटनेवरुन समोर आले़ परंडा तालुक्यातील एका ७० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना परंडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथून पुढील उपचारासाठी त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले़ उपचार सुरु असताना या व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली़ त्याचा अहवाल निगेटीव्ह आला.

मात्र, त्या व्यक्तीने उपचारादरम्यानच दोन दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला़ उपचार सुरु असताना या व्यक्तीचा मुलगा त्यांच्यासोबतच होता़ मात्र, मृत्यू झाल्यानंतर त्याने मृतदेह रुग्णालयातच सोडून एकट्यानेच गाव गाठले़ गावाकडे अंत्यविधीस विरोध होईल, मृतदेह नेता येणार नाही, असे आगतिकपणे सांगून त्याने गुपचूप रुग्णालय सोडले़ मयताच्या कुटूंबियांशी संपर्क केल्यानंतरही त्यांनी मृतदेह स्विकारण्यास असमर्थतता दर्शविल्याने नाईलाजास्तव पोलिसांनी उस्मानाबाद पालिकेला अंत्यविधीसाठी आर्जव केले़ पालिका कर्मचाऱ्यांनी मग पुढाकार घेऊन मयतावर सार्वजनिक स्मशानभूमीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार केले़ या घटनमुळे कोरोनाने निर्माण केलेली भिती, अंधविश्वास अन् मनामनात निर्माण केलेली दरी अधोरेखित झाली आहे़ 

अंत्यविधीसही झाला होता विरोध़उस्मानाबाद पालिकेकडून बेवारस असलेल्या मृतदेहांवर वेळोवेळी अंत्यसंस्कार केले जातात़ यासाठी शहरालगतचीच एक शासकीय जागा निश्चित केलेली आहे़ त्यामुळे याहीवेळी नेहमीप्रमाणे या जागेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका कर्मचारी मृतदेह  घेऊन गेले़ मात्र, याच भूखंडावर वास्तव्य करुन राहिलेल्या काही नागरिकांनी असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करीत अंत्यविधीस विरोध केला़ परिणामी, तो मृतदेह घेऊन कर्मचारी सार्वजनिक स्मशानभूमीत गेले अन् तेथेच अंत्यविधी केला़ 

मानवतेची भूमिका घेतली पाहिजे़कोरोनामुळे आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही़ शिवाय, मृत्यू झाला तरी यंत्रणा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देत नाही़ त्यामुळे एखाद्या अन्य आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मरणोपरांत सामाजिक छळ होणे उचित नाही़ अशा प्रकारचे ‘सोशल डिस्टन्स’ मानवी मनाला यातना देते़ त्यामुळे कोणताही गैरसमज करुन घेऊन मृतदेह बेवारस सोडणे, अंत्यविधीस विरोध करणे योग्य नाही़ नागरिकांनी सांमजस्याची, मानवतेची भूमिका घेतली पाहिजे़- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद

टॅग्स :Deathमृत्यूOsmanabadउस्मानाबादhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या