शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: उल्का नदीच्या पुरात सहा जण छतावर अडकले, एनडीआरएफने वेळीच वाचवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:42 IST

आमदार सावंत, खासदार निंबाळकर, माजी आमदार मोटेंच्या प्रयत्नांनी वाचले सहा जीव

- संतोष वीर

भूम (धाराशिव) : भूम तालुक्याच्या सीमेवरील आणि परांडा तालुक्यातील लाकी गावात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने उल्का नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने मध्यरात्री १२ वाजता घडलेल्या घटनेत सहा नागरिकांचा जीव धोक्यात सापडला होता. भूम तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी झाल्याने अंतरगाव परिसरातील बाणगंगा नदीला मोठा पूर आला होता. त्याच वेळी परांड्यातही पावसाचा जोर कायम असल्याने नदी-नाल्यांचा प्रवाह प्रचंड वाढला. बाणगंगेचे पाणी पुढे वाहत जाऊन लाकी गावाजवळील उल्का नदीत मिसळले आणि उल्का नदी ने धोक्याची पातळी ओलांडून पात्रा बाहेर पाणी वाहण्यास सुरुवात झाली. तब्बल एक किलोमीटरपर्यंत पाणी प्रवाहेन वाहू लागले. परिणामी लाकी गावातील पिंगळे व गायकवाड वस्ती पुराच्या पाण्यात वेढली गेली.

या भागात राहणाऱ्या १८ नागरिकांच्या घरांमध्ये रात्री अकरा वाजता पाणी शिरले. त्यामुळे हे नागरिक जीव मुठीत धरून घराच्या स्लॅबवर चढून रात्रभर पडत्या पावसात भिजत अडकून राहिले. यातील १२ नागरिक हे नदी पात्रा पासून थोडे दूर असल्याने सकाळी पाणी आटू लागल्यानंतर वाहत्या पाण्याचा अंदाज घेत. धाडस करून स्वतः सुरक्षित बाहेर आले. मात्र नदी पात्रा जवळ पाण्याचा जोर कायम असल्याने पांडुरंग पिंगळे, सुनिता पिंगळे, गोपिका गायकवाड, हरी मंडल, बाळू गायकवाड व अलका गायकवाड हे सहा नागरिक रात्रभर पावसात भिजत जीव मुठीत धरून बसले होते. सदरील भागात परिस्थिती गंभीर होत असल्याने आमदार तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधून सतत पाठपुरावा केला. नागरिकांना मदत मिळेपर्यंत ते पुरग्रस्तांच्या संपर्कात राहिले. सकाळी सहाच्या सुमारास एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली; मात्र पाण्याचा जोर कमी न झाल्याने त्यांना थांबावे लागले. शेवटी सकाळी नऊच्या सुमारास पाणी थोडे ओसरल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या सहा नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरही मागवण्यात आले होते. मात्र नगर परिसरात सकाळी सहा वाजता दाट धुके असल्याने हेलिकॉप्टर ला पूर आलेल्या भागाचे लोकेशन ट्रॅक झाले नाही. त्यामुळे ते वेळेत पोहोचू शकले नाही. नागरिक सुरक्षित झाल्यानंतरच हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पूरग्रस्त भागावर काही गिरट्या मारून परिस्थितीची पाहणी केली व नंतर परत गेले. या घटनेमुळे प्रशासनाच्या तत्परतेने व जनप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. गावकऱ्यांनी दिलासा व्यक्त करताना बचाव पथकाचे मनापासून आभार मानले.

टॅग्स :dharashivधाराशिवfloodपूरriverनदी