शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
3
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
4
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
5
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
6
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
7
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
8
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
9
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
10
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
11
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
12
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
13
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
14
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
15
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
16
‘गोल्डन गर्ल’चं नवं टार्गेट सेट, बिहारच्या राजकारणातील तरुण चेहऱ्याने वेधलं लक्ष, कोण आहे ती?
17
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: उल्का नदीच्या पुरात सहा जण छतावर अडकले, एनडीआरएफने वेळीच वाचवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:42 IST

आमदार सावंत, खासदार निंबाळकर, माजी आमदार मोटेंच्या प्रयत्नांनी वाचले सहा जीव

- संतोष वीर

भूम (धाराशिव) : भूम तालुक्याच्या सीमेवरील आणि परांडा तालुक्यातील लाकी गावात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने उल्का नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने मध्यरात्री १२ वाजता घडलेल्या घटनेत सहा नागरिकांचा जीव धोक्यात सापडला होता. भूम तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी झाल्याने अंतरगाव परिसरातील बाणगंगा नदीला मोठा पूर आला होता. त्याच वेळी परांड्यातही पावसाचा जोर कायम असल्याने नदी-नाल्यांचा प्रवाह प्रचंड वाढला. बाणगंगेचे पाणी पुढे वाहत जाऊन लाकी गावाजवळील उल्का नदीत मिसळले आणि उल्का नदी ने धोक्याची पातळी ओलांडून पात्रा बाहेर पाणी वाहण्यास सुरुवात झाली. तब्बल एक किलोमीटरपर्यंत पाणी प्रवाहेन वाहू लागले. परिणामी लाकी गावातील पिंगळे व गायकवाड वस्ती पुराच्या पाण्यात वेढली गेली.

या भागात राहणाऱ्या १८ नागरिकांच्या घरांमध्ये रात्री अकरा वाजता पाणी शिरले. त्यामुळे हे नागरिक जीव मुठीत धरून घराच्या स्लॅबवर चढून रात्रभर पडत्या पावसात भिजत अडकून राहिले. यातील १२ नागरिक हे नदी पात्रा पासून थोडे दूर असल्याने सकाळी पाणी आटू लागल्यानंतर वाहत्या पाण्याचा अंदाज घेत. धाडस करून स्वतः सुरक्षित बाहेर आले. मात्र नदी पात्रा जवळ पाण्याचा जोर कायम असल्याने पांडुरंग पिंगळे, सुनिता पिंगळे, गोपिका गायकवाड, हरी मंडल, बाळू गायकवाड व अलका गायकवाड हे सहा नागरिक रात्रभर पावसात भिजत जीव मुठीत धरून बसले होते. सदरील भागात परिस्थिती गंभीर होत असल्याने आमदार तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधून सतत पाठपुरावा केला. नागरिकांना मदत मिळेपर्यंत ते पुरग्रस्तांच्या संपर्कात राहिले. सकाळी सहाच्या सुमारास एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली; मात्र पाण्याचा जोर कमी न झाल्याने त्यांना थांबावे लागले. शेवटी सकाळी नऊच्या सुमारास पाणी थोडे ओसरल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या सहा नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरही मागवण्यात आले होते. मात्र नगर परिसरात सकाळी सहा वाजता दाट धुके असल्याने हेलिकॉप्टर ला पूर आलेल्या भागाचे लोकेशन ट्रॅक झाले नाही. त्यामुळे ते वेळेत पोहोचू शकले नाही. नागरिक सुरक्षित झाल्यानंतरच हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पूरग्रस्त भागावर काही गिरट्या मारून परिस्थितीची पाहणी केली व नंतर परत गेले. या घटनेमुळे प्रशासनाच्या तत्परतेने व जनप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. गावकऱ्यांनी दिलासा व्यक्त करताना बचाव पथकाचे मनापासून आभार मानले.

टॅग्स :dharashivधाराशिवfloodपूरriverनदी