शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dharashiv: उल्का नदीच्या पुरात सहा जण छतावर अडकले, एनडीआरएफने वेळीच वाचवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:42 IST

आमदार सावंत, खासदार निंबाळकर, माजी आमदार मोटेंच्या प्रयत्नांनी वाचले सहा जीव

- संतोष वीर

भूम (धाराशिव) : भूम तालुक्याच्या सीमेवरील आणि परांडा तालुक्यातील लाकी गावात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने उल्का नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने मध्यरात्री १२ वाजता घडलेल्या घटनेत सहा नागरिकांचा जीव धोक्यात सापडला होता. भूम तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी झाल्याने अंतरगाव परिसरातील बाणगंगा नदीला मोठा पूर आला होता. त्याच वेळी परांड्यातही पावसाचा जोर कायम असल्याने नदी-नाल्यांचा प्रवाह प्रचंड वाढला. बाणगंगेचे पाणी पुढे वाहत जाऊन लाकी गावाजवळील उल्का नदीत मिसळले आणि उल्का नदी ने धोक्याची पातळी ओलांडून पात्रा बाहेर पाणी वाहण्यास सुरुवात झाली. तब्बल एक किलोमीटरपर्यंत पाणी प्रवाहेन वाहू लागले. परिणामी लाकी गावातील पिंगळे व गायकवाड वस्ती पुराच्या पाण्यात वेढली गेली.

या भागात राहणाऱ्या १८ नागरिकांच्या घरांमध्ये रात्री अकरा वाजता पाणी शिरले. त्यामुळे हे नागरिक जीव मुठीत धरून घराच्या स्लॅबवर चढून रात्रभर पडत्या पावसात भिजत अडकून राहिले. यातील १२ नागरिक हे नदी पात्रा पासून थोडे दूर असल्याने सकाळी पाणी आटू लागल्यानंतर वाहत्या पाण्याचा अंदाज घेत. धाडस करून स्वतः सुरक्षित बाहेर आले. मात्र नदी पात्रा जवळ पाण्याचा जोर कायम असल्याने पांडुरंग पिंगळे, सुनिता पिंगळे, गोपिका गायकवाड, हरी मंडल, बाळू गायकवाड व अलका गायकवाड हे सहा नागरिक रात्रभर पावसात भिजत जीव मुठीत धरून बसले होते. सदरील भागात परिस्थिती गंभीर होत असल्याने आमदार तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधून सतत पाठपुरावा केला. नागरिकांना मदत मिळेपर्यंत ते पुरग्रस्तांच्या संपर्कात राहिले. सकाळी सहाच्या सुमारास एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली; मात्र पाण्याचा जोर कमी न झाल्याने त्यांना थांबावे लागले. शेवटी सकाळी नऊच्या सुमारास पाणी थोडे ओसरल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या सहा नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरही मागवण्यात आले होते. मात्र नगर परिसरात सकाळी सहा वाजता दाट धुके असल्याने हेलिकॉप्टर ला पूर आलेल्या भागाचे लोकेशन ट्रॅक झाले नाही. त्यामुळे ते वेळेत पोहोचू शकले नाही. नागरिक सुरक्षित झाल्यानंतरच हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पूरग्रस्त भागावर काही गिरट्या मारून परिस्थितीची पाहणी केली व नंतर परत गेले. या घटनेमुळे प्रशासनाच्या तत्परतेने व जनप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. गावकऱ्यांनी दिलासा व्यक्त करताना बचाव पथकाचे मनापासून आभार मानले.

टॅग्स :dharashivधाराशिवfloodपूरriverनदी