शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

कोरडा दुष्काळ जाहीर करा; आक्रमक शेतकरीपुत्रांनी रोखला हैदराबाद - शिर्डी मार्ग

By चेतनकुमार धनुरे | Updated: September 15, 2023 16:18 IST

तीन तास चालले आंदाेलन, काेरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पाथरूड (जि. धाराशिव) : पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिके वाया गेल्यात जमा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यासाेबतच पिकांचे तातडीने पंचनामे करून काेरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरीपुत्रांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत पाथरूड येथे हैदराबाद राज्य मार्ग राेखला. जवळपास तीन तास चाललेल्या या आंदाेलनामुळे दाेन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पावसाळा सरत आला असताना एकही दमदार पाऊस झालेला नाही. नदी-नाले अन् लहान - माेठे प्रकल्पही काेरडेठाक आहेत. पाण्याअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. काही वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. पशुधनासाठी चाराही उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाेबतच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ‘आ’वासून उभा आहे. असे असतानाही शासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केलेले नाहीत. २५ टक्के अग्रीमचाही पत्ता नाही. उपराेक्त चित्र पाहता, शासनाने तातडीने काेरडा दुष्काळ जाहीर करून उपाययाेजना राबविण्यास सुरुवात करणे आवश्यक असताना फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असल्याचे सांगत शुक्रवारी शेतकरीपुत्र रस्त्यावर उतरले. हैदराबाद राज्य मार्गावरील पाथरूड येथे रास्ता राेकाे आंदाेलन केले. जवळपास तीन तास हे आंदाेलन चालले. आंदाेलनात सहभागी शेतकरीपुत्रांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, आंदाेलनामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या.

आंदाेलनस्थळी केले मुंडणशेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेळावेळी लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सरकार आणि प्रशासनही याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचा आराेप करीत शेतकरीपुत्र संदीप खुणे याने आंदाेलनस्थळीच मुंडन केले. यावेळी जाेरदार घाेषणाबाजीही करण्यात आली.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद