शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कोरडा दुष्काळ जाहीर करा; आक्रमक शेतकरीपुत्रांनी रोखला हैदराबाद - शिर्डी मार्ग

By चेतनकुमार धनुरे | Updated: September 15, 2023 16:18 IST

तीन तास चालले आंदाेलन, काेरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पाथरूड (जि. धाराशिव) : पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिके वाया गेल्यात जमा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यासाेबतच पिकांचे तातडीने पंचनामे करून काेरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरीपुत्रांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत पाथरूड येथे हैदराबाद राज्य मार्ग राेखला. जवळपास तीन तास चाललेल्या या आंदाेलनामुळे दाेन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पावसाळा सरत आला असताना एकही दमदार पाऊस झालेला नाही. नदी-नाले अन् लहान - माेठे प्रकल्पही काेरडेठाक आहेत. पाण्याअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. काही वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. पशुधनासाठी चाराही उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाेबतच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ‘आ’वासून उभा आहे. असे असतानाही शासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केलेले नाहीत. २५ टक्के अग्रीमचाही पत्ता नाही. उपराेक्त चित्र पाहता, शासनाने तातडीने काेरडा दुष्काळ जाहीर करून उपाययाेजना राबविण्यास सुरुवात करणे आवश्यक असताना फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असल्याचे सांगत शुक्रवारी शेतकरीपुत्र रस्त्यावर उतरले. हैदराबाद राज्य मार्गावरील पाथरूड येथे रास्ता राेकाे आंदाेलन केले. जवळपास तीन तास हे आंदाेलन चालले. आंदाेलनात सहभागी शेतकरीपुत्रांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, आंदाेलनामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या.

आंदाेलनस्थळी केले मुंडणशेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेळावेळी लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सरकार आणि प्रशासनही याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचा आराेप करीत शेतकरीपुत्र संदीप खुणे याने आंदाेलनस्थळीच मुंडन केले. यावेळी जाेरदार घाेषणाबाजीही करण्यात आली.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद