शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

शेती विकूनही कर्ज फिटेना; तणावात पती-पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:28 IST

शेती साथ देत नसल्याने प्रकाश यांनी आपल्या चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली होती.

कळंब (जि. उस्मानाबाद) : सुखात चालणाऱ्या संसाराला दृष्ट लागावी अन् होत्याचं नव्हतं व्हावं, अशीच एक गंभीर घटना नायगाव येथे सोमवारी घडली असून, ३० वर्षांच्या तरुणाने पत्नीसह एकाचवेळी आत्महत्या करत आपला जीवन प्रवास संपवला आहे. दोघांनीही राहत्या घरी एकाच साडीने गळफास घेतला.

कळंब तालुक्यातील नायगाव येथील प्रकाश वसंत दीक्षित (पोतदार) हा ३० वर्षीय तरुण आपल्या आई व पत्नी अश्विनी (२६) यांच्यासमवेत गावात वास्तव्य करत होता. पितृछत्र हरपलेल्या प्रकाश यांना जेमतेम चार एकर जमीन. सातत्याने नैसर्गिक संकटात सापडलेली शेती, घरची बिकट आर्थिक परिस्थिती यामुळे या तोकड्या जमिनीत उदरनिर्वाह भागवणे त्यांना कठीण जात होते. यातूनच निर्माण झालेल्या आर्थिक संकटाने कुटुंबातही ताणतणाव होता, असे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, सोनार गल्ली भागातील आपल्या घरात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे प्रकाश अन् पत्नी एका खोलीत तर आजी रतन यांच्याजवळ प्रकाश यांचा एक लहान मुलगा व मुलगी झोपली होती. 

सोमवारी सकाळी पती-पत्नी लवकर बाहेर न आल्याने आत डोकावले असता प्रकाश व त्याची पत्नी अश्विनी यांनी एकाच साडीने घराच्या लोखंडी आडूला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शिराढोण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून सोमवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद केली. शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर रात्रीच्या सुमारास पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देणी देण्यासाठी दीड एकर विकली...शेती साथ देत नसल्याने प्रकाश यांनी आपल्या चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली होती. याउपरही देणं बाकीच होतं. यामुळे दाम्पत्यात ताणतणाव होता. यातून त्यांच्यात खटकेही उडत असत, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे त्यांची दोन चिमुकली पोरकी झाली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद