शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेती विकूनही कर्ज फिटेना; तणावात पती-पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:28 IST

शेती साथ देत नसल्याने प्रकाश यांनी आपल्या चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली होती.

कळंब (जि. उस्मानाबाद) : सुखात चालणाऱ्या संसाराला दृष्ट लागावी अन् होत्याचं नव्हतं व्हावं, अशीच एक गंभीर घटना नायगाव येथे सोमवारी घडली असून, ३० वर्षांच्या तरुणाने पत्नीसह एकाचवेळी आत्महत्या करत आपला जीवन प्रवास संपवला आहे. दोघांनीही राहत्या घरी एकाच साडीने गळफास घेतला.

कळंब तालुक्यातील नायगाव येथील प्रकाश वसंत दीक्षित (पोतदार) हा ३० वर्षीय तरुण आपल्या आई व पत्नी अश्विनी (२६) यांच्यासमवेत गावात वास्तव्य करत होता. पितृछत्र हरपलेल्या प्रकाश यांना जेमतेम चार एकर जमीन. सातत्याने नैसर्गिक संकटात सापडलेली शेती, घरची बिकट आर्थिक परिस्थिती यामुळे या तोकड्या जमिनीत उदरनिर्वाह भागवणे त्यांना कठीण जात होते. यातूनच निर्माण झालेल्या आर्थिक संकटाने कुटुंबातही ताणतणाव होता, असे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, सोनार गल्ली भागातील आपल्या घरात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे प्रकाश अन् पत्नी एका खोलीत तर आजी रतन यांच्याजवळ प्रकाश यांचा एक लहान मुलगा व मुलगी झोपली होती. 

सोमवारी सकाळी पती-पत्नी लवकर बाहेर न आल्याने आत डोकावले असता प्रकाश व त्याची पत्नी अश्विनी यांनी एकाच साडीने घराच्या लोखंडी आडूला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शिराढोण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून सोमवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद केली. शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर रात्रीच्या सुमारास पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देणी देण्यासाठी दीड एकर विकली...शेती साथ देत नसल्याने प्रकाश यांनी आपल्या चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली होती. याउपरही देणं बाकीच होतं. यामुळे दाम्पत्यात ताणतणाव होता. यातून त्यांच्यात खटकेही उडत असत, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे त्यांची दोन चिमुकली पोरकी झाली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद