शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेती विकूनही कर्ज फिटेना; तणावात पती-पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:28 IST

शेती साथ देत नसल्याने प्रकाश यांनी आपल्या चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली होती.

कळंब (जि. उस्मानाबाद) : सुखात चालणाऱ्या संसाराला दृष्ट लागावी अन् होत्याचं नव्हतं व्हावं, अशीच एक गंभीर घटना नायगाव येथे सोमवारी घडली असून, ३० वर्षांच्या तरुणाने पत्नीसह एकाचवेळी आत्महत्या करत आपला जीवन प्रवास संपवला आहे. दोघांनीही राहत्या घरी एकाच साडीने गळफास घेतला.

कळंब तालुक्यातील नायगाव येथील प्रकाश वसंत दीक्षित (पोतदार) हा ३० वर्षीय तरुण आपल्या आई व पत्नी अश्विनी (२६) यांच्यासमवेत गावात वास्तव्य करत होता. पितृछत्र हरपलेल्या प्रकाश यांना जेमतेम चार एकर जमीन. सातत्याने नैसर्गिक संकटात सापडलेली शेती, घरची बिकट आर्थिक परिस्थिती यामुळे या तोकड्या जमिनीत उदरनिर्वाह भागवणे त्यांना कठीण जात होते. यातूनच निर्माण झालेल्या आर्थिक संकटाने कुटुंबातही ताणतणाव होता, असे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, सोनार गल्ली भागातील आपल्या घरात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे प्रकाश अन् पत्नी एका खोलीत तर आजी रतन यांच्याजवळ प्रकाश यांचा एक लहान मुलगा व मुलगी झोपली होती. 

सोमवारी सकाळी पती-पत्नी लवकर बाहेर न आल्याने आत डोकावले असता प्रकाश व त्याची पत्नी अश्विनी यांनी एकाच साडीने घराच्या लोखंडी आडूला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शिराढोण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून सोमवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद केली. शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर रात्रीच्या सुमारास पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देणी देण्यासाठी दीड एकर विकली...शेती साथ देत नसल्याने प्रकाश यांनी आपल्या चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली होती. याउपरही देणं बाकीच होतं. यामुळे दाम्पत्यात ताणतणाव होता. यातून त्यांच्यात खटकेही उडत असत, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे त्यांची दोन चिमुकली पोरकी झाली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद