शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे अताेनात नुकसान, पंचनामे कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST

उस्मानाबाद -भूम तालुक्यात सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग ही पिके वाया गेल्यात जमा आहेत. ...

उस्मानाबाद -भूम तालुक्यात सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग ही पिके वाया गेल्यात जमा आहेत. तर साेयाबीन ही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाही प्रशासनाकडून पंचनाम्यास गती देण्यात आलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मागील काही वर्षांत भूमसह ईट परिसरातील शेतकरी साेयाबीनकडे वळाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साेयाबीनचा पेरा वाढला आहे. पेरणी व पेरणीनंतर अधून-मधून पाऊस झाला. साेयाबीनसह उडीद, मूग आदी पिके जाेमदार आली. दरम्यान, ही पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने ओढ दिली आहे. जवळपास २० ते २१ दिवस लाेटून ही पाऊस न झाल्याने उडीद, मूग वाया गेल्यात जमा आहे. तर साेयाबीन ही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे. परंतु, ईटसह परिसरात अद्याप ही प्रक्रिया गतिमान हाेताना दिसत नाही. अनेक शेतकरी गावस्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना फाेन करून पंचनामे करण्यासाठी विनंती करीत आहेत. परंतु, त्याचाही फारसा परिणाम हाेताना दिसत नाहीत. प्रशासनाच्या या असहकार भूमिकेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

चाैकट...

भूम तालुक्यातील आंबी मंडळात आजवर केवळ १४३ मिमी पाऊस झाला आहे. तसेच माणकेश्वर १९०, भूम २३९.७०, वालवड १७५.८० तर ईट सर्कलमध्ये अवघा १५१.६० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे ईटसह परिसरातील पिकांना अधिक फटका असला आहे. ही बाब लक्षात घेता, तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे.

प्रतिक्री...

तातडीने पंचनामे सुरू करा - प्रवीण देशमुख

ईटसह परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. माळरानावरील पिकांचा अक्षरश पाचाेळा झाला आहे. असे असतानाही नुकसानीचे पंचनामे हाेताना दिसत नाहीत. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी ईट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सदस्य प्रवीण देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहेत. निवेदनावर महिंद्र लिमकर, आण्णा शिंदे, राहुल सूळ, मिटू डाेंबाळे, सचिन स्वामी, कुमार खारगे, बाळासाहेब आव्हाड, सतीश नलवडे, सयाजी नलवडे, रामहरी लिमकर, संताेष खारगे, सुरज खारगे, गाैरव वालेकर, विक्रम हुंबे आदींची नावे आहेत.