शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे अताेनात नुकसान, पंचनामे कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST

उस्मानाबाद -भूम तालुक्यात सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग ही पिके वाया गेल्यात जमा आहेत. ...

उस्मानाबाद -भूम तालुक्यात सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग ही पिके वाया गेल्यात जमा आहेत. तर साेयाबीन ही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाही प्रशासनाकडून पंचनाम्यास गती देण्यात आलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मागील काही वर्षांत भूमसह ईट परिसरातील शेतकरी साेयाबीनकडे वळाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साेयाबीनचा पेरा वाढला आहे. पेरणी व पेरणीनंतर अधून-मधून पाऊस झाला. साेयाबीनसह उडीद, मूग आदी पिके जाेमदार आली. दरम्यान, ही पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने ओढ दिली आहे. जवळपास २० ते २१ दिवस लाेटून ही पाऊस न झाल्याने उडीद, मूग वाया गेल्यात जमा आहे. तर साेयाबीन ही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे. परंतु, ईटसह परिसरात अद्याप ही प्रक्रिया गतिमान हाेताना दिसत नाही. अनेक शेतकरी गावस्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना फाेन करून पंचनामे करण्यासाठी विनंती करीत आहेत. परंतु, त्याचाही फारसा परिणाम हाेताना दिसत नाहीत. प्रशासनाच्या या असहकार भूमिकेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

चाैकट...

भूम तालुक्यातील आंबी मंडळात आजवर केवळ १४३ मिमी पाऊस झाला आहे. तसेच माणकेश्वर १९०, भूम २३९.७०, वालवड १७५.८० तर ईट सर्कलमध्ये अवघा १५१.६० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे ईटसह परिसरातील पिकांना अधिक फटका असला आहे. ही बाब लक्षात घेता, तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे.

प्रतिक्री...

तातडीने पंचनामे सुरू करा - प्रवीण देशमुख

ईटसह परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. माळरानावरील पिकांचा अक्षरश पाचाेळा झाला आहे. असे असतानाही नुकसानीचे पंचनामे हाेताना दिसत नाहीत. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी ईट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सदस्य प्रवीण देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहेत. निवेदनावर महिंद्र लिमकर, आण्णा शिंदे, राहुल सूळ, मिटू डाेंबाळे, सचिन स्वामी, कुमार खारगे, बाळासाहेब आव्हाड, सतीश नलवडे, सयाजी नलवडे, रामहरी लिमकर, संताेष खारगे, सुरज खारगे, गाैरव वालेकर, विक्रम हुंबे आदींची नावे आहेत.