शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले; गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 18:50 IST

पीक काढणीला आले असताना सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली.

तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन एकरातील साेयाबीन पीक वाया गेले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेतून तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील ५४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

वडागाव काटी येथील नवनाथ नरहरी धावणे यांना तीन एकर जमीन आहे. चार पैसे हाती पडावेत, यासाठी त्यांनी खरीप हंगामात संपूर्ण क्षेत्रात साेयाबीनचे पीक घेतले. पीकही जाेमदार आले हाेते. हे पीक काढणीला आले असताना सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. या पावसामुळे साेयाबीन पीक पाण्याखाली गेले. हाताताेंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा,? या विवंचनेत ते हाेते. यातूनच त्यांनी मंगळवारी सकाळी शेतातील गाेठ्यासमाेर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. देवानंद पंडित धावणे (रा. वडगाव काटी) यांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या