शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले; गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 18:50 IST

पीक काढणीला आले असताना सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली.

तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन एकरातील साेयाबीन पीक वाया गेले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेतून तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील ५४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

वडागाव काटी येथील नवनाथ नरहरी धावणे यांना तीन एकर जमीन आहे. चार पैसे हाती पडावेत, यासाठी त्यांनी खरीप हंगामात संपूर्ण क्षेत्रात साेयाबीनचे पीक घेतले. पीकही जाेमदार आले हाेते. हे पीक काढणीला आले असताना सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. या पावसामुळे साेयाबीन पीक पाण्याखाली गेले. हाताताेंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा,? या विवंचनेत ते हाेते. यातूनच त्यांनी मंगळवारी सकाळी शेतातील गाेठ्यासमाेर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. देवानंद पंडित धावणे (रा. वडगाव काटी) यांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या