शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तीन मंडळात पिकाचे नमुना सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

लोहारा : तालुक्यात यंदा पावसाने खंड दिल्यामुळे खरीप हंगामाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या अनुषंगाने कृषी ...

लोहारा : तालुक्यात यंदा पावसाने खंड दिल्यामुळे खरीप हंगामाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील तीन मंडळात नुकतेच पिकाचे नमुना सर्वेक्षण देखील झाले आहे. परंतु, तालुका कृषी कार्यालयाकडून अहवाल काय सादर केला आहे. यावर नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून आगाऊ मिळणार का नाही, हे ठरणार आहे.

प्रतिकूल हवामान घटकांमुळे निर्माण झालेल्या नुकसानी संदर्भात कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार लोहारा तालुक्यातील माकणी, जेवळी व लोहारा या तीन महसूल मंडळातील लोहारा, भोसगा, एकोंडी (लो), मार्डी, वडगाव, जेवळी, कास्ती या गावांमध्ये नमुना सर्वेक्षण करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, विमा प्रतिनिधी यांच्या संयुक्त टीमने हे सर्वेक्षण करून सरासरी उत्पन्नाच्या किती टक्के नुकसान झाले, याचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी यांना दिला आहे. प्रतिकूल हवामान घटकामुळे सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के नुकसान होत असल्यास नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना आगाऊ देण्यात यावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार २८ जुलै रोजी कृषी आयुक्तांनी या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते.

लोहारा तालुक्यातील ५२ हजार ४४९ शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, तूर, बाजरी या पिकाचा विमा भरून ३८ हजार ३६५ हेक्टरवरील पिके संरक्षित केली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी विमा कंपनीकडे ३ कोटी ६ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे. तसेच शासन हिस्सा ४५ कोटी ६७ लाख रुपये विमा कंपनीकडे जमा होणार आहे. म्हणजेच, तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा हप्त्यापोटी विमा कंपनीकडे एकूण ४८ कोटी ७३ लाख रुपये जमा होणार आहेत. पावसाने सलग २१ दिवस खंड दिल्यामुळे अपेक्षित उत्पन्न यावर्षी निघणार नाही. त्यात उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे हे नमुना सर्वेक्षण करण्यात आले.

कोट......

गेल्या वर्षीच्या पीक विम्यासाठी उच्च न्यायालयात अजूनही संघर्ष सुरू आहे. आता पुन्हा प्रतिकूल हवामान घटकांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाच्या अहवालानुसार तातडीने तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यात यावी अन्यथा संघर्ष अटळ आहे.

- अनिल जगताप, माजी जिल्हा उपाध्यक्ष, रायुकाँ

यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे पिके जोमात आली. परंतु, प्रत्यक्षात सोयाबीनला फुले लागत असताना पाऊस गायब झाला आणि फुले गळाली. त्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पन्नातही ६० ते ७० टक्के घट येणार असल्याचे चित्र आहे.

- केशव पाटील, शेतकरी, खेड

तालुकास्तरीय संयुक्त समितीमार्फत पावसातील खंडामुळे झालेल्या उत्पादनामध्ये येणारी लक्षणीय घट आणि नुकसानीचे रँडम सर्वेक्षण करून अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे.

- मिलिंद बिडबाग, तालुका कृषी अधिकारी