शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Video:शिवसैनिकांनी पीकविमा कंपनीचे कार्यालय फोडत कर्मचाऱ्यांना फासले काळे

By चेतनकुमार धनुरे | Updated: January 24, 2023 14:08 IST

२०२२ च्या खरीप हंगामातील भरपाई नुकसानीच्या प्रमाणात देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली

उस्मानाबाद : २०२२ सालच्या खरीप हंगामातील भरपाई विमा कंपनीने नुकसानीच्या प्रमाणात दिला नसल्याचा आरोप करीत मंगळवारी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. कंपनीच्या कार्यालयात कर्मचार्यांना काळे फासून साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप २०२२ च्या हंगामात पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने ७० ते ८० टक्के नुकसान असतानाही अत्यंत तोकडी भरपाई वितरीत केली आहे. आतापर्यंत केवळ अडीचशे कोटी इतकीच भरपाई शेतकर्यांना देण्यात आली आहे. यातही अनेक शेतकर्यांना क्षेत्र मोठे असतानाही शेकड्यात भरपाई मिळाली. लाखो शेतकर्यांच्या पूर्वसूचना नाकरण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे खा.ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी केला होता. दरम्यान, कंपनीने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्याच्या प्रती आठवड्यात प्रशासनाकडे उपलब्ध करुन देण्याचा अल्टिमेटमही त्यांनी दिला होता.

मात्र, कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी १.१५ वाजता ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करीत उपस्थित कर्मचार्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. यानंतर कार्यालयातील खुर्च्या, टेबल व इतर साहित्याची तोडफोड करण्यात आली. विमा कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करीत कर्मचार्यांना बाहेर काढून टाळे ठोकण्यात आले. आता कंपनीच्या पुणे येथील मुख्यालयात अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी याप्रसंगी सांगितले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagitationआंदोलनOsmanabadउस्मानाबादShiv Senaशिवसेना