शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

झेंडा घेऊन अराजकता निर्माण करणे म्हणजे अविवेक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:11 AM

सच्चा आणि वृत्तीगांभीर्याने काम करणारा कोणीही साहित्यकार, कलावंत हा जात, धर्म, देश, वंश यांच्यापलीकडे जाणारा असतो.

संत गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : सच्चा आणि वृत्तीगांभीर्याने काम करणारा कोणीही साहित्यकार, कलावंत हा जात, धर्म, देश, वंश यांच्यापलीकडे जाणारा असतो. विशिष्ट विचारांनी भारलेल्या संघटनांनी निर्माण केलेल्या संभ्रमामुळे शरण जाणे खेदकारक आहे.शहाण्या, जाणत्या, सुसंस्कृत वाङ्मयप्रेमींचा विचार न करता या ना त्या गोष्टीने संमेलनाच्या संदर्भात निर्माण केलेल्या अराजकसदृश्य परिस्थितीला दरवेळी सामोरे जावे लागणे हेही खेदकारक आहे. आपण भान ठेवले पाहिजे की, हे किंवा ते झेंडे खांद्यावर घेणे म्हणजे आपण विचारी आहोत, हे सिद्ध करणे नाही. अशा प्रकारे वागणारा खरा विवेकी नव्हे, अशा परखड शब्दांत मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी आपली मते मांडली़ उस्मानाबाद येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर ढेरे बोलत होत्या.देश, धर्म वेगळा असला तरी आणि पुष्कळदा मातृभाषा वेगळी असली तरी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर प्रेम करणारे अनेक लोक मध्ययुगापासून मराठी मातीवर नांदले आहेत, हेही त्यांनी अधोरेखित केले. अरुणा ढेरे पुढे म्हणाल्या, संवादशक्ती आणि आत्मशक्ती गमावलेला एक भयभीत समाज ही आपली ओळख नाही. कोणतीही संस्कृती ही आरोळी देणाऱ्यांच्या, धाक दाखवणाऱ्यांच्या आणि बळजोरी करणाºयांच्या आक्रमकतेवर तरलेली नाही. ती साध्या, सामान्य माणसांच्या सत्शील कृत्यांवर आणि ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर तरलेली आहे.अत्यंत भ्रष्ट काळाचे प्रतिनिधी म्हणून उद्याच्या जगाने आपल्याला ओळखू नये, असे वाटत असेल तर आपला आंतरिक आवाज लावून धरणारे आणि नव्या पिढीवर विश्वास टाकणारे विवेकी लेखक आणि वाचक म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या, घट्ट करण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नात राहूया, असेही त्या म्हणाल्या.>उस्मानाबाद सांस्कृतिकदृष्ट्या समृद्धमहानगरांपेक्षा कितीतरी लहान असलेल्या व २३ टीएमसी पाण्याचा अनुशेष भरून निघेल याची वाट पाहत दुष्काळ अनुभवणाºया; पण सांस्कृतिकदृष्टया समृद्ध असलेल्या उस्मानाबाद परिसरात होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे ढेरे म्हणाल्या़>भारतीय भाषांशी स्नेह जोडण्याची परंपरा खंडितपरभाषक साहित्यकाराला आमंत्रित न करण्याच्या महामंडळाच्या निर्णयाने भारतीय भाषा मंडळाशी स्नेहसंवाद करीत राहण्याची एक वाट बंद झाली आहे, अशी माझी भावना आहे. आपण भारतीय भाषांशी स्नेह जोडण्याची एक सुंदर परंपरा खंडित केली आहे, असे मला वाटते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन