शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

झेंडा घेऊन अराजकता निर्माण करणे म्हणजे अविवेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:11 IST

सच्चा आणि वृत्तीगांभीर्याने काम करणारा कोणीही साहित्यकार, कलावंत हा जात, धर्म, देश, वंश यांच्यापलीकडे जाणारा असतो.

संत गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : सच्चा आणि वृत्तीगांभीर्याने काम करणारा कोणीही साहित्यकार, कलावंत हा जात, धर्म, देश, वंश यांच्यापलीकडे जाणारा असतो. विशिष्ट विचारांनी भारलेल्या संघटनांनी निर्माण केलेल्या संभ्रमामुळे शरण जाणे खेदकारक आहे.शहाण्या, जाणत्या, सुसंस्कृत वाङ्मयप्रेमींचा विचार न करता या ना त्या गोष्टीने संमेलनाच्या संदर्भात निर्माण केलेल्या अराजकसदृश्य परिस्थितीला दरवेळी सामोरे जावे लागणे हेही खेदकारक आहे. आपण भान ठेवले पाहिजे की, हे किंवा ते झेंडे खांद्यावर घेणे म्हणजे आपण विचारी आहोत, हे सिद्ध करणे नाही. अशा प्रकारे वागणारा खरा विवेकी नव्हे, अशा परखड शब्दांत मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी आपली मते मांडली़ उस्मानाबाद येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर ढेरे बोलत होत्या.देश, धर्म वेगळा असला तरी आणि पुष्कळदा मातृभाषा वेगळी असली तरी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर प्रेम करणारे अनेक लोक मध्ययुगापासून मराठी मातीवर नांदले आहेत, हेही त्यांनी अधोरेखित केले. अरुणा ढेरे पुढे म्हणाल्या, संवादशक्ती आणि आत्मशक्ती गमावलेला एक भयभीत समाज ही आपली ओळख नाही. कोणतीही संस्कृती ही आरोळी देणाऱ्यांच्या, धाक दाखवणाऱ्यांच्या आणि बळजोरी करणाºयांच्या आक्रमकतेवर तरलेली नाही. ती साध्या, सामान्य माणसांच्या सत्शील कृत्यांवर आणि ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर तरलेली आहे.अत्यंत भ्रष्ट काळाचे प्रतिनिधी म्हणून उद्याच्या जगाने आपल्याला ओळखू नये, असे वाटत असेल तर आपला आंतरिक आवाज लावून धरणारे आणि नव्या पिढीवर विश्वास टाकणारे विवेकी लेखक आणि वाचक म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या, घट्ट करण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नात राहूया, असेही त्या म्हणाल्या.>उस्मानाबाद सांस्कृतिकदृष्ट्या समृद्धमहानगरांपेक्षा कितीतरी लहान असलेल्या व २३ टीएमसी पाण्याचा अनुशेष भरून निघेल याची वाट पाहत दुष्काळ अनुभवणाºया; पण सांस्कृतिकदृष्टया समृद्ध असलेल्या उस्मानाबाद परिसरात होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे ढेरे म्हणाल्या़>भारतीय भाषांशी स्नेह जोडण्याची परंपरा खंडितपरभाषक साहित्यकाराला आमंत्रित न करण्याच्या महामंडळाच्या निर्णयाने भारतीय भाषा मंडळाशी स्नेहसंवाद करीत राहण्याची एक वाट बंद झाली आहे, अशी माझी भावना आहे. आपण भारतीय भाषांशी स्नेह जोडण्याची एक सुंदर परंपरा खंडित केली आहे, असे मला वाटते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन