शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

दिलासादायक ! १३४ कोटी पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:30 IST

तीन दिवसांतच वितरणाची कार्यवाही

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यातील ९२ टक्के वाटप पूर्ण तीन दिवसांतच वितरणाची कार्यवाही

उस्मानाबाद : अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी शासनाने पहिल्या टप्प्यात १४५ कोटी रुपये सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले होते. यानंतर अत्यंत गतीने काम करून अवघ्या तीनच दिवसांत जवळपास १३४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत उर्वरित रक्कमही पूर्णपणे वितरित करण्याची प्रक्रिया सुरूच होती.

ऑक्टोबरच्या मध्यात अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे २ लाख ६२ हजार हेक्टर्स शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यानंतर पंचनामे पूर्ण करून शासनाकडे एसडीआरएफअंतर्गत मदत मागण्यात आली होती. दरम्यान, शासनाने ९ नोव्हेंबर रोजी नुकसानीपोटी पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये, बागायतीसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात अर्धी म्हणजेच १४५ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपये प्रशासनाकडे साेपविण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तातडीने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही मदत शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना केल्या. तसेच नियमित आढावा घेतला. त्यामुळे अवघ्या तीनच दिवसांत प्राप्त निधीच्या ९२ टक्के रक्कम म्हणजेच १३३ कोटी ८४ लाख २५ हजार रुपये शुक्रवारी सकाळपर्यंत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात  आले. 

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळाला दिलासा रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काहीअंशी का असेना दिलासा मिळाला आहे. शिवाय, प्रशासनाच्या या गतीबद्दल शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मदत वाटपात वाशी तालुका आघाडीवर आहे. पहिल्या टप्प्यात आलेले ४ कोटी ७८ लाख रुपये तालुक्यातील २५ हजार १९२ शेतकऱ्यांना वाटप केले आहेत.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी