शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

दिलासादायक ! १३४ कोटी पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:30 IST

तीन दिवसांतच वितरणाची कार्यवाही

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यातील ९२ टक्के वाटप पूर्ण तीन दिवसांतच वितरणाची कार्यवाही

उस्मानाबाद : अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी शासनाने पहिल्या टप्प्यात १४५ कोटी रुपये सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले होते. यानंतर अत्यंत गतीने काम करून अवघ्या तीनच दिवसांत जवळपास १३४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत उर्वरित रक्कमही पूर्णपणे वितरित करण्याची प्रक्रिया सुरूच होती.

ऑक्टोबरच्या मध्यात अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे २ लाख ६२ हजार हेक्टर्स शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यानंतर पंचनामे पूर्ण करून शासनाकडे एसडीआरएफअंतर्गत मदत मागण्यात आली होती. दरम्यान, शासनाने ९ नोव्हेंबर रोजी नुकसानीपोटी पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये, बागायतीसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात अर्धी म्हणजेच १४५ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपये प्रशासनाकडे साेपविण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तातडीने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही मदत शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना केल्या. तसेच नियमित आढावा घेतला. त्यामुळे अवघ्या तीनच दिवसांत प्राप्त निधीच्या ९२ टक्के रक्कम म्हणजेच १३३ कोटी ८४ लाख २५ हजार रुपये शुक्रवारी सकाळपर्यंत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात  आले. 

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळाला दिलासा रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काहीअंशी का असेना दिलासा मिळाला आहे. शिवाय, प्रशासनाच्या या गतीबद्दल शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मदत वाटपात वाशी तालुका आघाडीवर आहे. पहिल्या टप्प्यात आलेले ४ कोटी ७८ लाख रुपये तालुक्यातील २५ हजार १९२ शेतकऱ्यांना वाटप केले आहेत.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी