शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

दिलासादायक ! १३४ कोटी पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:30 IST

तीन दिवसांतच वितरणाची कार्यवाही

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यातील ९२ टक्के वाटप पूर्ण तीन दिवसांतच वितरणाची कार्यवाही

उस्मानाबाद : अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी शासनाने पहिल्या टप्प्यात १४५ कोटी रुपये सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले होते. यानंतर अत्यंत गतीने काम करून अवघ्या तीनच दिवसांत जवळपास १३४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत उर्वरित रक्कमही पूर्णपणे वितरित करण्याची प्रक्रिया सुरूच होती.

ऑक्टोबरच्या मध्यात अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे २ लाख ६२ हजार हेक्टर्स शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यानंतर पंचनामे पूर्ण करून शासनाकडे एसडीआरएफअंतर्गत मदत मागण्यात आली होती. दरम्यान, शासनाने ९ नोव्हेंबर रोजी नुकसानीपोटी पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये, बागायतीसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात अर्धी म्हणजेच १४५ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपये प्रशासनाकडे साेपविण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तातडीने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही मदत शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना केल्या. तसेच नियमित आढावा घेतला. त्यामुळे अवघ्या तीनच दिवसांत प्राप्त निधीच्या ९२ टक्के रक्कम म्हणजेच १३३ कोटी ८४ लाख २५ हजार रुपये शुक्रवारी सकाळपर्यंत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात  आले. 

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळाला दिलासा रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काहीअंशी का असेना दिलासा मिळाला आहे. शिवाय, प्रशासनाच्या या गतीबद्दल शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मदत वाटपात वाशी तालुका आघाडीवर आहे. पहिल्या टप्प्यात आलेले ४ कोटी ७८ लाख रुपये तालुक्यातील २५ हजार १९२ शेतकऱ्यांना वाटप केले आहेत.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी