शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा पट्टा सावरत नाही तोच तेरणा पट्ट्यात ढगफुटीची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

कळंब : ऐन काढणी हंगामात पावसाचे ‘कमबॅक’ झाल्याने तालुक्यातील खरीप हंगामाचे आतोनात नुकसान झाले. गुरुवारी रात्री मांजरा तर शुक्रवारी ...

कळंब : ऐन काढणी हंगामात पावसाचे ‘कमबॅक’ झाल्याने तालुक्यातील खरीप हंगामाचे आतोनात नुकसान झाले. गुरुवारी रात्री मांजरा तर शुक्रवारी मध्यरात्री तेरणा पात्रात पावसाने कहर केला. हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे फड पाण्यात तरंगत आहेत. नदीकाठच्या उभ्या पिकातून पाणी वाहत असून, तर इतर ठिकाणच्या क्षेत्रावर ‘चिबड’ लागले आहे. कुठे घराची पडझड तर कुठे रस्ते बंद झाले होते. यासंबंधी ‘लोकमत’ने घेतलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.

मंगळवार, बुधवार व गुरुवार असा सलग तीन दिवस मांजरा नदीच्या पट्ट्यात पाऊस झाला. यातच लगतच्या बीड, केज, वाशी, भूम व पाटोदा या मांजराच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या तालुक्यात पाऊस झाल्याने मांजरामाय पोटोपोट वाहू लागली. यातच धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बॅकवॉटरला पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. यामुळे मांजरा नदीच्या तिरावरील बहुला, आढळा, सात्रा, खोंदला, भाटसांगवी, कळंब, खडकी या शिवारातील नदीकाठच्या जमिनीतील उभी पिके पाण्याखाली गेली. याशिवाय बॅकवॉटरच्या लोहटा पूर्व, पश्चिम, करंजकल्ला, हिंगणगाव, कोथळा, खडकी, कळंब, दाभा येथील शेतीस फटका बसला. लाभक्षेत्रातील आवाड शिरपुरा येथे तर शेकडो एकर उसाच्या फडातून पाणी वाहत होते. जुन्या व नव्या गावाचा पुलावरील पाण्यामुळे संपर्क तुटला होता.

यापाठोपाठ येरमाळा भागात शुक्रवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. पुढे तीन तास मोठा पाऊस झाला. या पावसाची तब्बल १०२ मिलिमीटर एवढी नोंद झाली. या वर्षातील या भागातील हा सर्वात मोठा पाऊस होता. यामुळे तेरणा नदीला मोठा पूर आला होता. हा पाऊस येरमाळ्यासह तेरणाकाठच्या मोहा, मस्सा महसूल मंडळातील गावातही बरसला आहे.

दरम्यान, मांजरा, तेरणा नदीकाठच्या भागासह तालुक्यातील इटकूर, मोहा, शिराढोण, खामसवाडी, गोविंदपूर, नाय, वाठवडा भागातही पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे फड पाण्यात गेले आहेत. गावोगावी शेतकरी प्रशासनाला मदतीची साद घालत आहेत.

तलाठी, कृषी सहायकांचा नाही पत्ता..

मांजरा काठावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाही नुकसान पाहण्यास तलाठी व कृषी सहायक काही गावात फिरकले नसल्याचे चित्र आहे. बहुला येथेही तलाठी आले नव्हते. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ईटकूर येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार रोहण शिंदे, तलाठी प्रवीण पालखे यांनी पाहणी केली.

केलेले कष्ट अतिवृष्टीत स्वाहा...

येरमाळा, रत्नापूर, शेलगाव दिवाने, शेलगाव (ज), संजितपूर, सापनाई, दहिफळ, गौर, सातेफळ, सौंदना, एरंडगाव आदी सर्व गावात पावसाने कहर केला. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे फड पाण्यात गेले. कष्टाने पिकवलेले पिवळे सोने पाण्यात मातीमोल झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना शनिवारी घास गोड लागला नाही. कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारी ही अपरिमित हानी डोळ्याने बघवणारी नव्हती.