शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झिरो झिरो म्हणता अजित पवारांच्या वाट्याला एक जागा; महाराष्ट्रात कोण पुढे? १ वाजेपर्यंतचे आकडे आले समोर
2
औरंगाबादमध्ये शिंदेच्या धनुष्यबाणाची कमाल; भुमरे आघाडीवर, खैरे तिसऱ्या क्रमांकावर! युती पुन्हा बालेकिल्ला खेचून घेणार?
3
विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये भाजपची सत्ता जवळपास निश्चित
4
भाजप केवळ २३६ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ९८; मग सत्ता कोणाच्या जिवावर...
5
UP मध्ये भाजपाला जबर फटका; योगींबाबत अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरणार?
6
Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर
7
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महायुतीत 'मोठ्या भावा'ने केली निराशा; जास्त जागा लढले, बालेकिल्ल्यातही मागे पडले
8
मोदी मॅजिक फेल! 400 सोडा, 300 चा आकडा पार करणेही अवघड, काँग्रेसचे दमदार पुनरागमन
9
Indore Lok sabha Election Result 2024: इंदूरमध्ये NOTA ने सर्व रेकॉर्ड तोडले, पहिल्यांदाच पडली इतकी मतं; कोणाला मिळाले लीड?
10
बर्थडे केक, गुलाबाचं फूल अन् मरीन ड्राईव्ह! 'या' अभिनेत्यासोबत रिंकूने साजरा केला वाढदिवस
11
पलटीबाज नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरणार? काँग्रेसच्या दिल्लीत मोठ्या हालचाली
12
Lok Sabha Election Result 2024 Live: NDA-INDIA मध्ये चुरस वाढली, काँटे की टक्कर
13
छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स, म्हणाल्या - 'मी तिथल्या लोकांना मातृभाषेतच...'
14
राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचे काय झालं? पाहा कोण आघाडीवर?
15
Lok Sabha Election Result 2024 : जेलमधूनच अरविंद केजरीवालांची निकालावर नजर; दिल्लीत काय होणार?
16
आई तुझा आशीर्वाद! मतमोजणीत आघाडी घेतल्यावर कंगना नतमस्तक, बॉलिवूडला जाण्याबद्दल म्हणाली...
17
Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूरात मोठा धमाका; निकाल आले समोर, राम सातपुते की प्रणिती शिंदे, कोण आघाडीवर?
18
अभिनेत्री नसती तर मृणाल दुसानीस या क्षेत्रात असती कार्यरत, म्हणाली- "या व्यतिरिक्त..."
19
Mumbai North West Lok Sabha Result 2024: काँटे की टक्कर! रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोण आघाडीवर?
20
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : बीड, सातारा, जालन्यासह महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मोठ्या उलथापालथीचे संकेत

आत्महत्या केलेल्या ७६ शेतकऱ्यांची प्रकरणे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:15 AM

उस्मानाबाद : जिल्ह्यात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत आत्महत्या केलेल्या ९४ शेतकऱ्यांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करून ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत आत्महत्या केलेल्या ९४ शेतकऱ्यांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करून त्यापैकी ७६ प्रकरणे पात्र ठरवून त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने घेतला आहे. संबंधित कुटुंबांना एक लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेशही संबंधित तहसीलदारांना दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शनिवारी येथे दिली.

जिल्ह्यात यापूर्वी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीकडून शासन निर्णयातील सुधारित निकषानुसार शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, मान्यताप्राप्त सावकार यांच्याकडून कर्ज घेतले असल्यास आणि या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे कर्जाचे हप्ते प्रलंबित असल्यास त्या व्यक्तीस मदतीसाठी पात्र ठरविण्यात यावे, या एकाच निकषानुसार शेतकरी आत्महत्या प्रकरणे ही पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येत होती. त्या निकषानुसार १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने एकूण ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली होती. या ९४ अपात्र शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे २४ डिसेंबर २०२० रोजी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये अपात्र होणाऱ्या प्रकरणांची संख्या खूप असून, त्याचा फेरआढावा घेण्याबाबत सूचना केली होती.

त्यानुसार उस्मानाबाद जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक ४ जानेवारी रोजी पार पडली. यात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत अपात्र झालेल्या ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्यात आले. या अपात्र ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत शासन निर्णय २३ जानेवारी २००६ नुसार नापिकी, राष्ट्रीयीकृत बँक/ सहकारी बँक किंवा मान्यताप्राप्त सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे होणारे कर्ज आणि कर्जपरतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या घडली असल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना १ लाख रुपये मदत देय राहील, असे नमूद आहे. त्यानुसार या अपात्र ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांपैकी ७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नापिकीमुळे झाल्याचे दिसून आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.