शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मार्चअखेर एसटीच्या 200 बस धावणार बॅटरीवर, १७२ बसस्थानकांत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:24 IST

तांत्रिक अडचणी दूर करून मार्चअखेर पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात धावणार आहेत. त्यामुळे  लवकरच सर्वसामान्य जनतेचे प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न  सत्यात उतरणार आहे.

धाराशिव :  राज्यातील १७२ बसस्थानकांत इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन निर्माण केली जाणार आहेत. या कामाचे कार्यारंभ आदेश निघाले असून, युद्धपातळीवर चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. तांत्रिक अडचणी दूर करून मार्चअखेर पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात धावणार आहेत. त्यामुळे  लवकरच सर्वसामान्य जनतेचे प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न  सत्यात उतरणार आहे.

प्रदूषण रोखणार, बचत होईलnवातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच इंधनावरचा खर्च कमी करण्यासाठी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. nत्यानुसार राज्यात एकूण ५ हजार १५० बस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात २०० बस मार्चअखेरपर्यंत विविध जिल्ह्यांतून धावायला सुरुवात होईल. यासाठी १७२ बसस्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. nचार्जिंग स्टेशनसाठी एसटी महामंडळाला स्पेशल सप्लाय घ्यावा लागणार आहे. यासाठी महावितरणकडे प्रतिसप्लाय २५ लाख रुपयांची सुरक्षा अनामत ठेवावी लागणार आहे.

२०० इलेक्ट्रिक बसराज्यातील १७२ चार्जिंग स्टेशनच्या कामाला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत ५ हजार १५० पैकी पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत.- अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ

बसच्या चार्जिंगसाठी लागणार तीन तास...एक  बस पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान तीन तासांचा अवधी लागेल. कमी दाबाने वीजपुरवठा हाेत असल्यास हा कालावधी आणखी वाढू शकताे. अशा ठिकाणी महावितरणकडून स्वतंत्र ट्रान्स्फाॅर्मर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक बस एकदा चार्जिंग केल्यास किमान तीनशे किलाेमीटर धावेल. डिझेलच्या तुलनेत विजेवर हाेणारा खर्च कमी असेल. एवढेच नाही तर सर्व्हिसिंगचा खर्चही बऱ्यापैकी कमी असेल.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर