शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

चारित्र्याच्या संशयावरून बहिणीस मारहाण, मेहुण्याने भाऊजीला चारचाकी अंगावर घालून चिरडले

By बाबुराव चव्हाण | Updated: January 18, 2024 19:32 IST

याप्रकरणी चाैघांविरुद्ध तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नाेंद झाला आहे.

तुळजापूर (जि. धाराशिव) : चारित्र्यावर संशय घेऊन बहिणीला नेहमी मारहाण केली जात असल्याचा राग मनात धरून मेहुण्याने मित्रांच्या मदतीने अंगावर चारचाकी वाहन घालून आपल्या भाऊजीचा (बहिणीचा पती) खून केला. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील अक्कलकाेट महामार्गावरील कसई पाटी येथे बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाैघांविरुद्ध तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नाेंद झाला आहे.

तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील बसवेश्वर भीमाशंकर जळकोटे (मयत) हे सोलापूर येथील कांदा मार्केटमध्ये हमालीचे काम करीत होते. तर, त्यांची पत्नी अश्विनी जळकोटे या मंगरूळ येथील कंचेश्वर साखर कारखाना परिसरातील खासगी कॅन्टीनमध्ये मजुरीचे कामासाठी हाेत्या. चारित्र्याच्या संशयावरून या दाेघांमध्ये नेहमी कडाक्याचे भांडण हाेत असे. यातूनच अश्विनी यांना बेदम मारहाणही केली जात हाेती. 

हाच राग मनात धरून मेहुणा सागर सुभाष धबडे (रा. कास्ती, जि. साेलापूर) याने आपल्या तिघा मित्रांच्या मदतीने भाऊजी बसवेश्वर जळकाेटे यांना अक्कलकाेट महामार्गावरील कसई पाटी येथे बेदम मारहाण केली. मारहाणीत बसवेश्वर जळकाेटे अक्षरश: रक्ताने माखले हाेते. अशा गंभीर जखमी अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला उभे असतानाच सागरने आपल्या ताब्यातील  चारचाकी वाहन त्यांच्या अंगावर घातले असता ते रक्ताच्या थाराेळ्यात पडले. 

उपस्थितांनी गंभीर जखमी अवस्थेत बसवेश्वर यांना खाजगी वाहनातून मंगरूळ येथील आराेग्य केंद्रात दाखल केले. परंतु, प्रचंड रक्तस्राव सुरू असल्याने तेथील डाॅक्टरांनी वाहनातच तपासणी करून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. ताेवर उशीर झाला हाेता. उपस्थित डाॅक्टरांनी तपासणी करून बसवेश्वर यांना मयत घाेषित केले. यानंतर पाेलिसांनी संबंधित घटनेचा पंचनामा करून शव नातेवाइकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मयताची बहीण वनिता सिद्धेश्वर ममाने (रा. कसई) यांनी गुरुवारी तुळजापूर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मयताची पत्नी, मेहुणा व अन्य तिघे अशा चाैघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेपूर्वी नेमकं काय घडलं हाेतं?बुधवारी सायंकाळी ६ वाजता मयताची पत्नी अश्विनी, मुलगा आणि मुलगी असे तिघे फिर्यादी वनिता ममाने यांच्या घरी गेले हाेते. भाऊ घेण्यासाठी आल्याने अश्विनी आपल्या मुलांसह कसई पाटीवर गेल्या हाेत्या.  यावेळी त्यांच्यासाेबत वनिता आणि त्यांचा मुलगा ओंकारही हाेता. पिकअपमधून उतरून अश्विनी मुलांसह भाऊ थांबलेल्या कारकडे जात असतानाच आतमध्ये सागर धबडे (अश्विनी यांचा भाऊ), इतर तिघे आणि बसवेश्वर हेही हाेते. पत्नीला पाहून ‘अशू, तुझ्या भावाने खूप मारले गं’ असं म्हणत बसवेश्वर  माेठ्यानं ओरडले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत ते गाडीतून उतरून रस्त्याच्या कडेला थांबले असता, सागर याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात पाेहाेचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्याेत मालवली, असे वनिता ममाने यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद