शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दिवाळी आधी चोरट्यांचा धमाका, फटाक्यांच्या कारखान्यातून चोरली बॉम्बची सुतळी

By चेतनकुमार धनुरे | Updated: September 6, 2023 16:57 IST

कारखानदाराने सुतळी बॉम्ब तयार करण्यासाठी सुतळी आणून ठेवली होती.

धाराशिव : महाराष्ट्राची शिवकाशी समजल्या जाणाऱ्या तेरखेडा येथील फटाका कारखान्यांमध्ये सध्या दिवाळीसाठी फटाके निर्मितीची लगबग सुरु आहे. यात चोरट्यांनीही उच्छाद मांडला असून, एका कारखान्यातून बॉम्ब बनवण्यासाठी आणलेली ४५ हजारांची रंगीत सुतळीच चोरट्यांनी पळवून नेली आहे. याबाबत वाशी ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

तेरखेडा हे फटाका उद्योगासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जवळपास शंभरावर कारखान्यातून येथे वर्षभर फटाका निर्मितीचे काम सुरु असते. आता दिवाळी दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे फटाक्यांची मागणी लक्षात घेऊन कारखानदारांनी निर्मितीला वेग दिला आहे. तेरखेडा येथील फिर्यादी कल्याण रामभाऊ उकरंडे यांचाही कारखाना आहे. या कारखान्यात त्यांनी सुतळी बॉम्ब तयार करण्यासाठी सुतळी आणून ठेवली होती. त्याला रंग देऊन ते खुल्या ठिकाणी वाळवून एका खोलीत ठेवले होते. दरम्यान, अज्ञात चाेरट्यांनी मंगळवारी सुमारे ४५ हजार रुपये किंमतीची ही सुतळीच पळवून नेली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उकरंडे यांनी सायंकाळी वाशी ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fire crackerफटाकेOsmanabadउस्मानाबाद