शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

बळीराजाची व्यथा... सततच्या लॉकडाऊनमुळे 5 एकरवरील टरबूज बनलं जनावरांचा घास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:34 IST

मराठवाड्यात आजही पारंपरिक पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात काही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातही उत्पादन वाढीपेक्षा नुकसानीचाच त्यांना सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यात आजही पारंपरिक पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात काही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातही उत्पादन वाढीपेक्षा नुकसानीचाच त्यांना सामना करावा लागत आहे.

मुंबई/उस्मानाबाद - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा शेतकऱ्यांनाही चांगलाच फटका बसला आहे. शेतकऱ्यांना माल विकण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी लॉकडाऊनमुळे ग्राहक मिळत नाही, मिळालं तरी कमी किंमतीत माल विकावा लागत आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या देवळाली येथील एका शेतकऱ्याने चक्क 5 एकर कलिंगड जनावराच्या दावणीला बांधलं आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात किंमत नसल्यानं ही वेळ आल्याचं शेतकरी  यांनी म्हटलंय.   

मराठवाड्यात आजही पारंपरिक पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात काही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातही उत्पादन वाढीपेक्षा नुकसानीचाच त्यांना सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटासोबत आता कोरोनाच्या महासंकटामुळे बागायतदार शेतकऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. भाऊसाहेब गायकवाड यांना देवळाली शिवारात 21 एकर क्षेत्र आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्यांनी गतवर्षी 3 एकरात दोडक्याची लागवड केली. मात्र, लॉकडाऊनमुळे दोडके हे वेलालाच वाळून गेले. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा फेब्रुवारी महिन्यात भाऊसाहेब आणि त्यांचे बंधू नानासाहेब गायकवाड यांनी तब्बल 5 एकरात टरबूज पिकाची लागवड केली, पण यंदाही पुन्हा एप्रिल, मे आणि जून महिन्यातील लॉकडाऊनमुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले.  

3 लाखांच्या उत्पादनावर लॉकडाऊनने पाणी फेरले

फवारणी, मशागत आणि औषधसाठी गेल्या चार महिन्यात 50 हजार रुपये खर्च करण्यात आले. अविरत परिश्रमाच्या जोरावर एक नग 6 ते 7 किलोचा झाला होता. किमान 3 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला तरी 3 लाखाचे उत्पादन होईल, असा आशावाद होता. मात्र, काढणीच्या प्रसंगी असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या फडावर व्यापारीच फिरकले नाहीत. शिवाय सर्व बाजारपेठा बंद असल्याने विक्री कुठे करावी? हा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणीच फेरले. 

काढणी खर्च टाळण्यासाठी फुकटात टरबूज

भाऊसाहेबांच्या शेतात डेरेदार टरबूज पडून आहेत. आता खरीपासाठी क्षेत्र रिकामे करण्याच्या दृष्टीने वावरात पडलेली टरबूज जनावरांच्या दावणीवर जात आहेत. भरघोस उत्पादनाऐवजी आता शेतातील टरबूज बाहेर काढण्यासाठी गायकवाड यांना 15 हजाराचा खर्च आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे या नुकसानीकडे लक्ष तरी कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे फुकट टरबूज घेऊन जाण्याचं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं.  

गावातील वाढत्या कोरोनामुळे कुणीच फिरकेना 

गावात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि निर्माण झालेले वातावरण यामुळे फुकटही कोणी घेऊन जाण्यास धजत नाही. खर्च टाळण्यासाठी अख्ख कुटुंब राबतंय. उत्पादन नाही किमान काढणीला अधिकचा खर्च होऊ नये, म्हणून गायकवाड कुटुंबातील सर्व सदस्य हे टरबूजाच्या फडात राबले. टरबूजाची जोपासना करण्यात जे हात राबत होते. त्याच हातांनी हे टरबूज जनावरांच्या दावणीवर टाकण्याची नामुष्की या शेतकरी कुटुंबीयांवर आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद