शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बळीराजाने धरली चाढ्यावर मूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:21 IST

(फोटो : सुशील शुक्ला २९) परंडा : जिल्ह्याच्या बहुतांश भागात खरीप पेरण्या संपत आल्या असल्या, तरी परंडा तालुक्यात मात्र ...

(फोटो : सुशील शुक्ला २९)

परंडा : जिल्ह्याच्या बहुतांश भागात खरीप पेरण्या संपत आल्या असल्या, तरी परंडा तालुक्यात मात्र अद्याप पेरणीयोग्य पावसाने हजेरी लावलेली नव्हती. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. अखेर मागील दोन दिवसांत तालुक्याच्या अनेक भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने बळीराजाने चाढ्यावर मूठ धरली असून, अनेक शेतकरी पेरणीसाठी भाडोत्री ट्रॅक्टरचा वापर करीत असल्याचे दिसत आहे.

तालुक्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर रोहिणी नक्षत्राच्या पावसाने काही भागात तुरळक व मध्यम स्वरूपाची हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली. मात्र, जमिनीत पुरेशी ओल नाही आणि पाऊसही थांबल्याने शेतकरी पेरण्या थांबवून पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर मागील दोन दिवसात बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे पेरण्यांना प्रारंभ झाला आहे. तालुक्यात नामांकित कंपनीचे तूर, उडीद, सोयाबीन आणि मूग बियाणांचा तुटवडा भासत आहे. शिवाय, अनेक शेतकरी पेरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत असले, तरी सातत्याने वाढत असलेल्या इंधन दरवाढीमुळे पेरणी व शेती मशागतीचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे.

तालुक्याची पावसाची सरासरी ६१५ मिलिमीटर असून, २८ जूनपर्यंत ९६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी. अन्यथा दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला आहे. त्यामुळे काही भगातील शेतकरी अजूनही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.