शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

नंदगावातील आराे प्लाँट धूळखात, साडेपाच लाखांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

नंदगाव (जि. उस्मानाबाद) -तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लाँट बसविले. परंतु, ...

नंदगाव (जि. उस्मानाबाद) -तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लाँट बसविले. परंतु, चार वर्षांच्या काळात ग्रामस्थांना घाेटभरही शुद्ध पाणी मिळाले नाही. त्यामुळे सध्या दाेन्ही प्लाँट अक्षरश धूळखात पडून आहेत. याअनुषंगाने आता ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे शासकीय निधीतून ऑगस्ट-सप्टेंबर २०१७ मध्ये प्रत्येकी २ लाख ७५ हजार रुपये या प्रमाणे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लाँट उभारले. ग्रामस्थांना शुद्ध पाणी माफक दरात मिळावे, हा या मागचा उद्देश. परंतु, दाेन्ही प्लाँट मागील चार वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये धूळखात पडून आहेत. आजवर ग्रामस्थांना घाेटभरही शुद्ध पाणी मिळालेले नाही. हा मुद्दा सरपंच सरस्वती कलशेट्टी यांच्याकडे उपस्थित केला असता, ‘‘आपण सत्तेत येण्यापूर्वीच ही याेजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे याेजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी का पुरविले जात नाही, याचे कारण माझ्याकडे नाही. असे असले तरी काही दिवसांपूर्वीच सदरील याेजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने ग्रामसेवकांना सूचना केली हाेती. मात्र, त्यांनी आजवर आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे तूर्तास हा प्लाँट बंदच आहे. दरम्यान, ग्रामसेवक रमेश धड्डे यांच्याकडे विचाणा केली असता, आरओ प्लाँट सुरू केल्यानंतर त्याचे वेस्टेज पाणी काेठे साेडायचे, हा प्रश्न आहे. आणि आमच्याकडे कर्मचारीही नाहीत. एवढेच नाही तर काेणी चालवायलाही घेत नाहीत, असे सांगितले.

चाैकट...

सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून आरओ प्लाँट बसविण्यात आले. परंतु, सुरू करण्याचे काेणी नाव घेत नाही. सुरूच करायचे नव्हते, तर प्लाँट बसविले कशासाठी? ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत नाही.

-प्रदीप वाघमारे, ग्रामस्थ, नंदगाव.

आरओ प्लाँट बसविल्यानंतर ते कार्यान्वित करणे गरजेचे आहे. परंतु, संबंधित मंडळी काम करून माेकळी झाली. ग्रामस्थांना पाणी मिळाे की न मिळाे, याची त्यांनी काळजी केली नाही. विद्यमान सरपंच, सदस्यांनी तरी याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-सुरेश जमादार, ग्रामस्थ, नंदगाव.