शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : संपूर्ण राज्यात बंजारा समाजाचे पाच हजार तांडे आहेत. दीड कोटी संख्या बंजारा समाजाची आहे. समाजाचे मूलभूत प्रश्न ...

उस्मानाबाद : संपूर्ण राज्यात बंजारा समाजाचे पाच हजार तांडे आहेत. दीड कोटी संख्या बंजारा समाजाची आहे. समाजाचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. राज्यात बंजारा समाजाला व्हीजीएनटी प्रवर्गातून ५.५ टक्के आरक्षण मिळत आहे. मात्र, समाजाचे मूलभूत प्रश्न सुटले नसल्याने बंजारा समाजाला मूळ अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता अनुसूचित जमाती प्रवर्गात आदिवासी ब प्रवर्ग तयार करून बंजारा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी राज्याचे माजी वनमंत्री आमदार सजंय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार सजंय राठोड हे दि. २६ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, देशातील विविध राज्यांमध्ये बंजारा समाजाचे अस्तित्व आहे. सर्वांची बोलीभाषा, पेहराव एकच आहे. परंतु, काही राज्यांत बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट आहे, तर काही ठिकाणी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे. राज्यात व्ही.जे.एन.टी. प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश आहे. राज्यातील समाजाचे अद्याप मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. काबाडकष्ट करणारा समाज असून, ऊसतोड, वीटभट्टी, बांधकाम मजूर म्हणून काम करीत आहे. समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळणे गरज आहे. मूळच्या भटक्या विमुक्त ‘अ’ व ‘ब’ या प्रवर्गाला सध्याचे अस्तित्वात असलेली साडेपाच टक्के आरक्षणाची टक्केवारी अनुसूचित जमातीच्या आरक्षणास बाधित न करता आदिवासी ब प्रवर्ग निर्माण करून आरक्षण आवश्यक आहे, मूळच्या भटक्या विमुक्त ‘अ’ व ‘ब’ या प्रवर्गाची जनगणना करून त्याचप्रमाणे अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात यावी, मूळच्या भटक्या विमुक्त ‘अ’ व ‘ब’ या प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची जाचक अटक रद्द करणे गरजचे आहे. बंजारा भाषेला २३ भाषेचा दर्जा देण्यात यावा आदी २५ मागण्या समाजाच्या असून, ते सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याचे राठोड म्हणाले, याकरिता राज्यभरातील समाजबांधवांशी संवाद साधला जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी टी. सी. राठोड, गुलाबराव जाधव यांची उपस्थिती होती.

राजकारणाची पातळी खाली आली

राजकारणात या अगादेरही आरोप होत होते. मात्र सध्या राजकारण वैयक्तिक पातळीवर आले आहे. उठल्याबरोबरच आज कोणाचा नंबर लागतो हे पाहावे लागते. आरोप करा, चौकशी होऊ द्या, महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा राजकारण्यांनी जपली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मी स्वत: राजीनामा दिला असून, मुख्यमंत्र्यांना चौकशी करा दोषी असलो तर बाजूला करा, नसलो तर घ्या, असे बोललो असल्याचे ते म्हणाले.