शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : संपूर्ण राज्यात बंजारा समाजाचे पाच हजार तांडे आहेत. दीड कोटी संख्या बंजारा समाजाची आहे. समाजाचे मूलभूत प्रश्न ...

उस्मानाबाद : संपूर्ण राज्यात बंजारा समाजाचे पाच हजार तांडे आहेत. दीड कोटी संख्या बंजारा समाजाची आहे. समाजाचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. राज्यात बंजारा समाजाला व्हीजीएनटी प्रवर्गातून ५.५ टक्के आरक्षण मिळत आहे. मात्र, समाजाचे मूलभूत प्रश्न सुटले नसल्याने बंजारा समाजाला मूळ अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता अनुसूचित जमाती प्रवर्गात आदिवासी ब प्रवर्ग तयार करून बंजारा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी राज्याचे माजी वनमंत्री आमदार सजंय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार सजंय राठोड हे दि. २६ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, देशातील विविध राज्यांमध्ये बंजारा समाजाचे अस्तित्व आहे. सर्वांची बोलीभाषा, पेहराव एकच आहे. परंतु, काही राज्यांत बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट आहे, तर काही ठिकाणी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे. राज्यात व्ही.जे.एन.टी. प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश आहे. राज्यातील समाजाचे अद्याप मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. काबाडकष्ट करणारा समाज असून, ऊसतोड, वीटभट्टी, बांधकाम मजूर म्हणून काम करीत आहे. समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळणे गरज आहे. मूळच्या भटक्या विमुक्त ‘अ’ व ‘ब’ या प्रवर्गाला सध्याचे अस्तित्वात असलेली साडेपाच टक्के आरक्षणाची टक्केवारी अनुसूचित जमातीच्या आरक्षणास बाधित न करता आदिवासी ब प्रवर्ग निर्माण करून आरक्षण आवश्यक आहे, मूळच्या भटक्या विमुक्त ‘अ’ व ‘ब’ या प्रवर्गाची जनगणना करून त्याचप्रमाणे अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात यावी, मूळच्या भटक्या विमुक्त ‘अ’ व ‘ब’ या प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची जाचक अटक रद्द करणे गरजचे आहे. बंजारा भाषेला २३ भाषेचा दर्जा देण्यात यावा आदी २५ मागण्या समाजाच्या असून, ते सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याचे राठोड म्हणाले, याकरिता राज्यभरातील समाजबांधवांशी संवाद साधला जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी टी. सी. राठोड, गुलाबराव जाधव यांची उपस्थिती होती.

राजकारणाची पातळी खाली आली

राजकारणात या अगादेरही आरोप होत होते. मात्र सध्या राजकारण वैयक्तिक पातळीवर आले आहे. उठल्याबरोबरच आज कोणाचा नंबर लागतो हे पाहावे लागते. आरोप करा, चौकशी होऊ द्या, महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा राजकारण्यांनी जपली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मी स्वत: राजीनामा दिला असून, मुख्यमंत्र्यांना चौकशी करा दोषी असलो तर बाजूला करा, नसलो तर घ्या, असे बोललो असल्याचे ते म्हणाले.