शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

संतापजनक ! जात पंचायतीने विष्ठा खाण्यास पाडले भाग, महिलेस केले नग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 15:17 IST

Crime in Osmanabad : दंडातील पैश्यांच्या वसुलीसाठी जातपंचायतीतील लोक दांम्पत्यास सातत्याने त्रास देत होते.

ठळक मुद्दे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा जात पंचायतीच्या पंचावर गुन्हा

उस्मानाबाद : शहरातील काका नगर भागात राहणाऱ्या एका दांम्पत्यास समाजातून बहिष्कृत करीत त्यांना केलेला दंड वसूल करण्यासाठी जातपंचायतीच्या पंचांनी ( Jat Panchayat) अत्यंत घृणास्पद वर्तन केल्याचे समाेर आले आहे. त्रासाला वैतागून पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीने आपल्या तक्रारीत पंचाचा पाढा वाचला असून, याप्रकरणी बुधवारी मध्यरात्री आनंदनगर ठाण्यात गुन्हा (Crime in Osmanabad ) दाखल झाला.

पळसप येथील सोमनाथ व सुनिता काहे हे दांम्पत्य उस्मानाबादेतील काका नगरात वास्तव्याला होते. जवळपास आठ वर्षांपूर्वी त्यांच्याकडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने जातपंचायतीने त्यांना चार एकर शेती व ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. या पैश्यांच्या वसुलीसाठी जातपंचायतीतील लोक त्यांना सातत्याने त्रास देत होते. वसुलीच्याच अनुषंगाने १८ सप्टेंबर रोजी पुन्हा पंचायत बसविण्यात आली होती. याठिकाणी पंच म्हणून राजा गुलाब चव्हाण, मोतीराम आगल्या काळे, भागवत पवार, पापा शिंदे, रामदास चव्हाण, नाना काळे हे बसले होते. याशिवाय, जवळपास २५ इतर व्यक्तीही तेथे होत्या. त्यांनी वसुलीसोबतच सोमनाथचे मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याचे व त्याने पोलिसांना मदत केल्याचे आरोप करुन दुसरी शिक्षा लावली. यानुसार सोमनाथला त्यांनी विष्ठा खाण्यास भाग पाडले. त्याच्या पत्नीस नग्न करुन मारहाण केली. या प्रकाराने व्यथित झालेल्या सोमनाथ व सुनिता यांनी २४ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले असता, सुनिताची प्रकृती सुधारली. मात्र, सोमनाथची प्रकृती खालावत जावून त्याचा ५ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यामुळे जातपंचायतीच्या लोकांमुळेच पतीने आत्महत्या केल्याची तक्रार सुनिता काळे यांनी बुधवारी आनंदनगर ठाण्यात दिली. त्यानुसार मध्यरात्री जातपंचायतीच्या लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'दंड भर नाहीतर घृणास्पद शिक्षा करू'; जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

एसपीनी घेतली गंभीर दखल...उस्मानाबादेत हे प्रकरण घडल्याचे समजताच पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी तातडीने पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. पीडित महिलेच्या संपर्कात राहून आरोपी पंचावर गुन्हे दाखल करुन घेतले. शिवाय, असे प्रकार पुन्हा जिल्ह्यात घडणार नाहीत, अशी खबरदारी घेण्याच्या सूचनाही पोलिसांना केल्या. त्यामुळे जातपंचायतींना चाप बसेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी