शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ऊस तोडणीत दिरंगाई झाल्याने संतप्त शेतकरी करणार ऊसाची होळी; कारखाने, अधिकाऱ्यांना दिले निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 15:37 IST

शेतकऱ्यांनी सामुहिकरित्या ऊस पेटवून देण्याचा संकल्प केला आहे.

उस्मानाबाद : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सध्या कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे़ शिवाय, तोड लवकर होत नसल्याने शेतकरी आणखीच संकटात सापडले आहेत़ त्यामुळे वैतागलेल्या सांजा येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी सामुहिकरित्या ऊस पेटवून देण्याचा संकल्प केला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती़ मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी उपलब्ध नाही़ त्यामुळे ऊस जागेवरच वाळत चालला आहे़ येथील शेतकरी हे परिसरातील जवळपास ६ कारखान्यांचे सभासद आहेत़ सभासद असूनही हे कारखाने या शेतकऱ्यांचा ऊस नेत नाहीत़ मनमानी कारभार त्यांच्याकडून सुरु असल्याची या शेतकऱ्यांची तक्रार आहे़ णकरी ६ हजार रुपये ऊसतोड मजुरी, वाहन एंट्री एका खेपेस ५०० रुपये  घेऊन कारखान्यांनी शेतकऱ्यांची लूट चालविली आहे़ त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे पाऊस उचलत असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केला आहे़

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे अडचणीत आलेले हे शेतकरी २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता सांजा शिवारातीलनामदेव आण्णासाहेब नायकल यांच्या फडापासून सामुहिक ऊस पेटविण्याच्या उपक्रमाला सुरुवात करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ या उपक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रादेशिक सहसंचालक साखर, कारखान्यांचे चेअरमन व कार्यकारी संचालकांना दिले आहे़

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती