शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पोलिसांना पकडून दिल्याचा राग; आरोपींनी घरात घुसून एकास उचलले, केली निर्घृण हत्या

By चेतनकुमार धनुरे | Updated: June 10, 2023 13:25 IST

पोलिसांनी सहाही आरोपींवर गुन्हा अपहरण तसेच खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

धाराशिव : पाेलिसांना एका गुन्ह्यात पकडून दिल्याचा राग व्यक्त करीत गुरुवारी सायंकाळी माळकरंजा येथील एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिराढोण ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींना ताब्यात घेईपर्यंत मृतदेह स्विकारणार नाही, असा पवित्रा शुक्रवारी सकाळी मृताच्या नातेवाईकांनी घेतला होता.

महादेव हिरा काळे (४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते माळकरंजा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी आशाबाई काळे यांनी दिलेल्या पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार महादेव काळे हे गुरुवारी सायंकाळी आपल्या घरी असताना ६ वाजण्याच्या सुमारास आरोपी विकास बब्रु काळे, सुरज पवार, गंगाराम पवार, बबलु पवार, खाजा पवार व रवि काळेचा मुलगा असे सहाजण घरात शिरले. त्यांनी जुनी कुरापत काढून भांडण सुरु केले. 

पूर्वीच्या एका गुन्ह्यात आम्हाला का पकडून दिले, अशी विचारणा करीत महादेव काळे यांना घरासमोर मारहाण केली. यानंतर जीपमध्ये घालून महादेव काळे यांना तेथून ते घेवून गेले. घरातील लाेक शोध घेत असताना उशिराने महादेव काळे यांचा मृतदेह मंगरुळ पाटी येथे पडल्याचे त्यांना समजले. आरोपींनी त्यांचे अपहरण करुन त्यांना जिवे मारुन मृतदेह मंगरुळ पाटी येथे टाकल्याचे आशाबाई काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शुक्रवारी शिराढोण पोलिसांनी सहाही आरोपींवर गुन्हा अपहरण तसेच खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद