शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पावसामुळेच शेती व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: May 15, 2015 00:49 IST

उमरगा/लोहारा : पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत

उमरगा/लोहारा : पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. हे चित्र बदल्याणसाठी शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबण्याच मदत होईल, असा विश्वास राज्याचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल (वस्त्र उद्योग) यांनी व्यक्त केला. पोरवाल यांनी गुरूवारी तालुक्यातील माडजसह अन्य गावांना भेटी देवून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये बैठकही घेण्यात आली. या बैठकीनंतर पोरवाल यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, आ. ज्ञानराज चौगुले, उपविभागीय अधिकारी निलेश श्रिंगी, तहसीलदार ज्योती चव्हाण, गटविकास अधिकारी बी. बी. खंडागळे यांची उपसिथताी होती.पोरवाल म्हणाले की, अत्यल्प पावसामुळे शेती पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पादनातून खर्च निघणेही कठीण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. सातत्याची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळूनच शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊ उचलित आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंवर्धन हा महत्वपूर्ण उपाय असल्याचे सांगत पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याचाच एक भाग म्हणून शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. यामाध्यमातून नाला सरळीकरण, खोलीकरण, शेततळे, गाळ काढणे, सामाजिक वनीकरण आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. (वार्ताहर) भावना शासनापर्यंत पोहोंचवूअपर मुख्य सचिव पोरवाल यांनी लोहारा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. शेतकरी मनोहर येल्लोरे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियास शासनाचे अर्थसहाय्य मिळाले असले तरी हे कुटुंब आज उघड्यावर आले आहे. पोरवाल यांनी येल्लोरे यांच्या पत्नी भारतबाई येल्लोरे, मुलगा अनिल यांच्याशी चर्चा करून परिस्थित जाणून घेतली. ‘कुटुंबियांच्या भावना शासनापर्यंत पोहोंचविल्या जातील’, असे पोरवाल यांनी यावेळी सांगितले.