शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

अल्प पावसामुळेच शेती व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: May 15, 2015 00:49 IST

उमरगा/लोहारा : पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत

उमरगा/लोहारा : पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. हे चित्र बदल्याणसाठी शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबण्याच मदत होईल, असा विश्वास राज्याचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल (वस्त्र उद्योग) यांनी व्यक्त केला. पोरवाल यांनी गुरूवारी तालुक्यातील माडजसह अन्य गावांना भेटी देवून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये बैठकही घेण्यात आली. या बैठकीनंतर पोरवाल यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, आ. ज्ञानराज चौगुले, उपविभागीय अधिकारी निलेश श्रिंगी, तहसीलदार ज्योती चव्हाण, गटविकास अधिकारी बी. बी. खंडागळे यांची उपसिथताी होती.पोरवाल म्हणाले की, अत्यल्प पावसामुळे शेती पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पादनातून खर्च निघणेही कठीण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. सातत्याची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळूनच शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊ उचलित आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंवर्धन हा महत्वपूर्ण उपाय असल्याचे सांगत पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याचाच एक भाग म्हणून शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. यामाध्यमातून नाला सरळीकरण, खोलीकरण, शेततळे, गाळ काढणे, सामाजिक वनीकरण आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. (वार्ताहर) भावना शासनापर्यंत पोहोंचवूअपर मुख्य सचिव पोरवाल यांनी लोहारा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. शेतकरी मनोहर येल्लोरे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियास शासनाचे अर्थसहाय्य मिळाले असले तरी हे कुटुंब आज उघड्यावर आले आहे. पोरवाल यांनी येल्लोरे यांच्या पत्नी भारतबाई येल्लोरे, मुलगा अनिल यांच्याशी चर्चा करून परिस्थित जाणून घेतली. ‘कुटुंबियांच्या भावना शासनापर्यंत पोहोंचविल्या जातील’, असे पोरवाल यांनी यावेळी सांगितले.