शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

उस्मानाबादच्या शेतकऱ्याने घेतले विधानभवनाबाहेर पेटवून;पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 23, 2022 14:57 IST

यापूर्वी सुभाष देशमुख यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिसांकडे कधीही कोणती तक्रार केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाशी (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी स्वत:ला विधानभवनाबाहेर पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी वेळीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. शेतजमिनीच्या कौटुंबिक वादातून या शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

सुभाष भानुदास देशमुख असे पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, मूळचे ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईतच वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटूंबाकडे वडिलोपार्जित १६ एकर जमीन आहे. सुभाष देशमुख यांना इतर चार भाऊ होते. त्यापैकी एकजण अंध होते. काही वर्षांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने उर्वरित चार भावंडांमध्ये प्रत्येकी ४ एकर जमिनीची वाटणी झालेली आहे. सुभाष देशमुख यांच्या वाट्याला आलेली ४ एकर जमीन हे त्यांचेच एक भाऊ कसतात. दरम्यान, वाटणीत बदल करण्याची मागणी, सुभाष देशमुख करीत होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी शंका तांदुळवाडी स्थानिकांनी व्यक्त केली. तर त्यांच्या एका पुतण्याने नेमके कशासाठी त्यांनी हे केले, याची महिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, यापूर्वी सुभाष देशमुख यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिसांकडे कधीही कोणती तक्रार केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रकृती धोक्याबाहेरसुभाष भानुदास देशमुख यांनी विधानभवनाबाहेर अचानक पेटवून घेतले. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आग विझवत त्यांना रुग्णालयात दाखल केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. देशमुख यांची प्रकृती स्थिर असून २० ते ३० टक्के भाजल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र