शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

उस्मानाबाद जिल्ह्यातील ८१ प्रकल्प कोरडे; उपयुक्त जलसाठा केवळ ५ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:57 IST

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५७ टक्के पर्जन्यमान झाले.

ठळक मुद्दे९१ तलाव ज्योत्याखाली टंचाईची दाहकता वाढली

उस्मानाबाद : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५७ टक्के पर्जन्यमान झाले. भूम, परंडा या दोन तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस झाला होता. अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे अनेक गावांना ऐन हिवाळ्यातच टंचाईच्या झळा बसू लागल्या होत्या. सध्या अशा गावात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. आजघडीला जिल्हाभरातील २२३ पैकी ८१ प्रकल्प कोरडेठाक आहेत. तर दुसरीकडे ९१ प्रकल्प ज्योत्याखाली गेले आहेत. सर्व प्रकल्पांतर्गत मिळून केवळ ५ टक्के एवढाच उपयुक्त साठा आहे.

पावसाळ्याच्या सुरूवातीला वरूणराजाने जोरदार ऐन्ट्री केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिली. वार्षिक सरासरीच्या ४४५.४० मि. मी. एवढा अल्प पाऊस झाला. याचा फटका शेती पिकांना बसला. यासोबतच प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पात गतवर्षी मार्च महिन्यामध्ये ५१.८० टक्के उपयुक्त साठा होता. यंदा मात्र उपयुक्त साठा उरलेला नाही. जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांची संख्या १७ एवढी आहे. यापैकी साकत, चांदणी, खासापूरी, रायगव्हाण आणि रूई हे पाच प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्याचप्रमाणे खंडेश्वर, संगमेश्वर, रामगंगा, वाघोली, तेरणा या प्रकल्पात उपयुक्त साठा उरलेला नाही. मध्यम प्रकल्पामध्ये सध्या उपयुक्त साठा केवळ ५.११ टक्के एवढा उरला आहे. आठवडाभरात जवळपास ५ टक्क्यांनी उपयुक्त साठा घटला आहे. मागील आठवड्यात ११.१६ टक्के एवढा उपयुक्त साठा असल्याचे लघु पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, गतवर्षीच्या जलसाठ्यावर नजर टाकली असता, मार्च २०१८ मध्ये मध्यम प्रकल्पात ४७.६२ टक्के उपयुक्त साठा होता.

मध्यम प्रकल्पाप्रमाणेच लघु प्रकल्पांची अवस्थाही बिकट बनली आहे. २०५ पैकी ७६ प्रकल्प कोरडे पडले असून, ८५ प्रकल्प ज्योत्याखाली आहेत. ढोकी, कोल्हेगाव, करजखेडा, वडाळा, खामसवाडी, घुगी, येवती, टाकळी, केशेगाव, सांजा, वरूडा, बेंबळी आदी प्रकल्पात पाण्याचा थेंबही उरलेला नाही. लघु प्रकल्पामध्ये सध्या ५.८५ टक्के उपयुक्त साठा उरला आहे. तर लघु आणि मध्यम प्रकल्पात मिळून ५ टक्के उपयुक्त साठा आहे.

दृष्टीक्षेपात प्रकल्पप्रकल्प        संख्या    पाणीसाठामोठे        ०१    ०.०मध्यम        १७    ५.११लघु        २०५    ५.८५एकूण        २२३    ५.००

सर्वच प्रकल्प कोरडे जिल्ह्यात लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांची संख्या सव्वा दोनशेच्या घरात आहे. मात्र, अत्यल्प पर्जन्यमानामुळे या सर्वच प्रकल्पांच्या घशाला कोरड पडली आहे. यापैकी एकही प्रकल्प १०० टक्के भरलेला नाही. ५१ ते ७५ टक्क्यापर्यंत केवळ एका प्रकल्पात साठा आहे. २६ ते ५० टक्क्यापेक्षा कमी साठा असलेले प्रकल्प १९ आहेत. तर २५ टक्क्यापेक्षा कमी पाणी साठा असलेले प्रकल्प ३१ एवढे आहेत. ज्योत्याखालील प्रकल्प ९१ असून ८१ प्रकल्प कोरडे पडले आहेत.

गतवर्षी होता ३३ टक्के साठाजिल्ह्यातील २२३ प्रकल्पामध्ये गतवर्षी ३३.०४ टक्के एवढा उपयुक्त साठा होता. या तुलनेत यंदा अल्प साठा उरला आहे. ५ टक्के एवढा साठा असल्याचे लघु पाटबंधारे विभागाने सांगितले. प्रकल्पातील जलसाठा दिवसागणिक झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामस्थांना तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागू शकते.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद