शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिल्या १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z समाज आक्रमक, सरकारविरोधात जोरदार निदर्शने
3
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
4
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
5
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
6
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
7
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
8
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
9
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
10
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
11
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
12
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक
13
"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."
14
विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
15
Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!
16
खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
17
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
18
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
19
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
20
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातील जेवणातून ७० जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:28 IST

ग्णांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

उमरगा ( धाराशिव) : तालुक्यातील कराळी येथील ७० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. रुग्णांवर सरकारी आणि खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

तालुक्यातील कराळी गावात एका कुटुंबाने मंगळवारी ( दि. १५) रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गावातील जवळपास अडीचशे ग्रामस्थांनी येथे जेवण केले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी बुधवारी दुपारी काही ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून आली. जवळपास ४० रुग्णांना तुरोरी येथील विजय क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर याबाबतची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी तात्काळ दवाखान्यास भेट दिली. रुग्णांची पाहणीकरून एक आरोग्य पथक कराळी गावात तपासणीसाठी पाठवले. 

दरम्यान, १६ जणांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तर काहींवर गावातच उपचार सुरु केले आहेत. जवळपास ७० च्या आसपास विषबाधा झालेले रुग्ण आढळून आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. काही रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार व तुरोरी येथील विजय क्लिनिकचे डॉ. विक्रांत शिंदे यांनी दिली.

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिरकराळी येथे मंगळवारी जागरण गोंधळ कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून एक आरोग्य पथक कराळी गावातच ठेवण्यात आले आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. - डॉ. उमाकांत बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी उमरगा

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाdharashivधाराशिव