शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

६ हजार इच्छुक फडात, आता प्रचाराचा धुरळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST

उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीतून सोमवारी माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी ७ तालुक्यांतून तब्बल २ हजार २१३ जणांनी आपले अर्ज काढून ...

उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीतून सोमवारी माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी ७ तालुक्यांतून तब्बल २ हजार २१३ जणांनी आपले अर्ज काढून घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या जवळपास दहा हजार जणांपैकी आता ६ हजार जण रिंगणात राहिले आहेत. यातही बरेचसे सदस्य समोर एकही अर्ज न राहिल्याने बिनविरोध निघाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यातील जवळपास ४० हून अधिक ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. एकूण १३७७ प्रभागांतील ३ हजार ६५२ सदस्यांसाठी ही निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी ९ हजार ९४७ अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती यातील १५७ अर्ज अवैध ठरले. यानंतर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी शुक्रवार व सोमवार असे दोन इच्छुकांना मिळाले. दरम्यानच्या काळात दोन दिवस मिळाल्याने अनेकांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांची मनधरणी केली. यात यश आल्यानंतर सोमवारी अखेरच्या दिवसापर्यंत भूम वगळता इतर ७ तालुक्यांतील २ हजार २१३ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे ६ हजार ९६ अर्ज शिल्लक राहिले आहेत. संबंधितांना चिन्हांचे वाटपही सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले. त्यामुळे लागलीच मंगळवारपासून उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा ग्रामीण भागात उडविल्याचे पाहायला मिळाले.

बिनविरोधमध्ये उमरगा, लोहाऱ्याचा डंका...

जिल्ह्यात ४२८ पैकी ४० ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. यामध्ये उमरगा अन् लोहारा तालुक्याने आदर्श घालून दिला. उमरगा तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींपैकी ११ बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे ३८ गावांतच निवडणुका होतील. त्यापाठोपाठ सर्वात कमी २६ ग्रामपंचायती असलेल्या लोहारा तालुक्यातही ५ बिनविरोध निघाल्या. येथे २१ गावांतच निवडणुका होतील. याशिवाय उस्मानाबाद ३, तुळजापूर ४, कळंब ६, वाशी १, भूम ५ तर परंडा तालुक्यातही ५ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.

४७७ सदस्य जिंकले...

उस्मानाबाद तालुक्यात बिनविरोध ग्रामपंचायतींचे २४ तर एकही अर्ज समोर राहिला नसल्याने १५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. तुळजापूर तालुक्यात ३५, उमरगा तालुक्यात सर्वाधिक १३१, लोहारा तालुक्यात ८२, कळंब ७९, वाशी ५७ तर परंडा तालुक्यात ५४ सदस्य बिनविरोध निवडले गेले. त्यांची अधिकृत घोषणा बाकी आहे. यामध्ये केवळ भूम तालुक्यातील आकडेवारी प्रशासनाकडे अपडेट झाली नव्हती. ती झाल्यास बिनविरोध सदस्यसंख्या वाढेल.

भूममध्ये प्रशासन हतबल...

भूम तालुक्यातील आकडेवारीचा घोळ मंगळवारी सायंकाळ उलटली तरी मार्गी लागलेला नव्हता. त्यामुळे या तालुक्यातील किती सदस्य बिनविरोध निघाले, किती इच्छुकांनी माघार घेतली व किती उमेदवार रिंगणात राहिले, याचा मेळ लागलेला नव्हता.