शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

६ हजार इच्छुक फडात, आता प्रचाराचा धुरळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST

उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीतून सोमवारी माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी ७ तालुक्यांतून तब्बल २ हजार २१३ जणांनी आपले अर्ज काढून ...

उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीतून सोमवारी माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी ७ तालुक्यांतून तब्बल २ हजार २१३ जणांनी आपले अर्ज काढून घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या जवळपास दहा हजार जणांपैकी आता ६ हजार जण रिंगणात राहिले आहेत. यातही बरेचसे सदस्य समोर एकही अर्ज न राहिल्याने बिनविरोध निघाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यातील जवळपास ४० हून अधिक ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. एकूण १३७७ प्रभागांतील ३ हजार ६५२ सदस्यांसाठी ही निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी ९ हजार ९४७ अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती यातील १५७ अर्ज अवैध ठरले. यानंतर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी शुक्रवार व सोमवार असे दोन इच्छुकांना मिळाले. दरम्यानच्या काळात दोन दिवस मिळाल्याने अनेकांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांची मनधरणी केली. यात यश आल्यानंतर सोमवारी अखेरच्या दिवसापर्यंत भूम वगळता इतर ७ तालुक्यांतील २ हजार २१३ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे ६ हजार ९६ अर्ज शिल्लक राहिले आहेत. संबंधितांना चिन्हांचे वाटपही सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले. त्यामुळे लागलीच मंगळवारपासून उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा ग्रामीण भागात उडविल्याचे पाहायला मिळाले.

बिनविरोधमध्ये उमरगा, लोहाऱ्याचा डंका...

जिल्ह्यात ४२८ पैकी ४० ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. यामध्ये उमरगा अन् लोहारा तालुक्याने आदर्श घालून दिला. उमरगा तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींपैकी ११ बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे ३८ गावांतच निवडणुका होतील. त्यापाठोपाठ सर्वात कमी २६ ग्रामपंचायती असलेल्या लोहारा तालुक्यातही ५ बिनविरोध निघाल्या. येथे २१ गावांतच निवडणुका होतील. याशिवाय उस्मानाबाद ३, तुळजापूर ४, कळंब ६, वाशी १, भूम ५ तर परंडा तालुक्यातही ५ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.

४७७ सदस्य जिंकले...

उस्मानाबाद तालुक्यात बिनविरोध ग्रामपंचायतींचे २४ तर एकही अर्ज समोर राहिला नसल्याने १५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. तुळजापूर तालुक्यात ३५, उमरगा तालुक्यात सर्वाधिक १३१, लोहारा तालुक्यात ८२, कळंब ७९, वाशी ५७ तर परंडा तालुक्यात ५४ सदस्य बिनविरोध निवडले गेले. त्यांची अधिकृत घोषणा बाकी आहे. यामध्ये केवळ भूम तालुक्यातील आकडेवारी प्रशासनाकडे अपडेट झाली नव्हती. ती झाल्यास बिनविरोध सदस्यसंख्या वाढेल.

भूममध्ये प्रशासन हतबल...

भूम तालुक्यातील आकडेवारीचा घोळ मंगळवारी सायंकाळ उलटली तरी मार्गी लागलेला नव्हता. त्यामुळे या तालुक्यातील किती सदस्य बिनविरोध निघाले, किती इच्छुकांनी माघार घेतली व किती उमेदवार रिंगणात राहिले, याचा मेळ लागलेला नव्हता.