शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने ४ हजार हेक्टर्स बाधित, सहा कोटींची मागणी

By चेतनकुमार धनुरे | Updated: April 18, 2023 18:40 IST

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला होता.

धाराशिव : मार्चपाठोपाठ एप्रिल महिन्यातही अवकाळीचा तडाखा सुरुच आहे. ७ ते ९ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे व पावसामुळे विशेषत: बागायती व फळपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, सुमारे ४ हजार हेक्टर्स क्षेत्र यामुळे बाधित झाले असून, त्यापोटी सवासहा कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला होता. याचा सर्वाधिक फटका हा धाराशिव व कळंब तालुक्याला बसला आहे. या दोनच तालुक्यात सुमारे ३८७० हेक्टर्स क्षेत्र बाधित झाले आहे. महसूल व कृषी विभागाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण केले आहेत. मंगळवारी या नुकसानीचा अहवाल तयार होवून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील ६ हजार ६९२ शेतकर्यांच्या फळ, पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे एकूण ३ हजार ९८३ हेक्टर्स ८० आर क्षेत्र बाधित झाले असून, यापोटी शासनाकडे ६ कोटी २४ लाख ६८ हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादagricultureशेती