शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

१२ साखर कारखान्यांकडून ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांची संख्या जवळपास साेळा एवढी आहे. परंतु, नुकत्याच सरलेल्या गाळप हंगामात अवघ्या ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांची संख्या जवळपास साेळा एवढी आहे. परंतु, नुकत्याच सरलेल्या गाळप हंगामात अवघ्या बारा कारखान्यांचे धुराडे पेटले. या सर्व कारखान्यांनी मिळून सुमारे ७३ लाख ४२ हजार १९२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ऊसगाळपात कळंब तालुक्यातील रांजनी येथील नॅचरल शुगरने बाजी मारली. या कारखान्याने सर्वाधिक आठ लाख आठ हजार ८६० मे.टन उसाचे गाळप केले, तर पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिलने केवळ एक लाख २४ हजार ३९९ मे. टन उसाचे गाळप केले आहे.

एकेकाळी जिल्ह्यातील तेरणा, तुळजाभवानी हे सहकारी साखर कारखाने उसाच्या गाळपात आघाडीवर राहत हाेते. परंतु, मागील काही वर्षात जिल्ह्यात खासगी कारखान्यांचेही माेठ्या प्रमाणात जाळे विस्तारले आहे. सहकार क्षेत्रातील तेरणा, तुळजाभवानी हे दाेन्ही माेठे कारखाने बंद असल्याने सध्या खासगी कारखान्यांची चलती आहे. नुकत्याच सरलेल्या हंगामात खासगी कारखान्यांनीच गाळपात बाजी मारल्याचे दिसून येते. जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून जवळपास साेळा कारखाने आहेत. यापैकी तेरणा, श्री तुळजाभवानी, नृसिंह आणि नितळी येथील जयलक्ष्मी हे चार कारखाने बंद राहिले. उर्वरित बारा कारखान्यांनी मात्र उसाचे गाळप केले. यामध्ये प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या रांजनी येथील नॅचर शुगरने तब्बल आठ लाख आठ हजार ८६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून अव्वल क्रमांक पटकाविला. यानंतर लाेहारा तालुक्यातील खेड येथील सर्वाधिक सहा हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या ‘लाेकमंगल’ने चार लाख ८४ हजार २२४ मे. टन उसाचे गाळप करून द्वितीय क्रमांक पटकाविला. तिसऱ्या क्रमांकावर भैरवनाथ शुगर हा कारखाना आहे. साडेतीन हजार मे. टन गाळप क्षमता असणाऱ्या या कारखान्याने तीन लाख ६४ हजार ४६८ मे.टन. गाळप केले आहे. मुरूम येथील ‘विठ्ठलसाई’ने तीन लाख २८ हजार ७७८, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने तीन लाख तीन हजार ७७६, वाशी येथील शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखान्याने दाेन लाख २८ हजार १५८, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने दाेन लाख ४० हजार ७६९, बाणगंगा कारखान्याने दोन लाख ८८ हजार ६८६, ‘डीडीएन’ने दोन लाख ४८ हजार २७५, धाराशिव शुगरने तीन लाख ३२ हजार ७९०, कंचेश्वर शुगरने तीन लाख ३१ हजार ४२५ आणि भीमाशंकर शुगरने सर्वात कमी एक लाख २४ हजार ३९९ मे. टन उसाचे गाळप केले. यापैकी चार कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारीमध्येच गुंडाळला गेला, तर उर्वरित आठ कारखान्यांचा हंगाम मार्चमध्ये आटाेपला. बंद असलेले कारखाने पुढील हंगामात सुरू झाल्यास हे चित्र आणखी बदलेल.

चाैकट...

साखर उताऱ्यात दाेन कारखाने पुढे...

उसाचे सर्वाधिक गाळप करण्यात ‘नॅचरल’ने बाजी मारली असली तरी साखर उताऱ्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना व कंचेश्वर शुगरने बाजी मारली आहे. दाेन्ही कारखान्याला प्रत्येकी १०.५५ टक्के उतारा मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर विठ्ठलसाई साखर कारखाना आहे. १०.२२ टक्के एवढा उतारा आहे. तसऱ्या क्रमांकावर नॅचर शुगर कारखाना आहे. ९.६१ टक्के एवढा उतारा मिळाला आहे. शिवशक्तीला ९.३४ टक्के, भाऊसाहेब बिराजदार ९.३०, बाणगंगा ८.७२, डीडीएन ८.५४, भीमाशंकर ९.३९, धाराशिव ९.४९, भैरवनाथ ९.१० तर ‘लाेकमंगल’चा साखर उतारा केवळ ७.९२ टक्के आला आहे.

३८ लाख क्विंटल साखर उत्पादित...

जिल्ह्यातील साेळा पैकी बारा कारखान्यांनी उसाचे गाळप केले. या सर्व कारखान्यांनी मिळून संपूर्ण गाळप हंगामात ३८ लाख ५९ हजार ८४३ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. नॅचरल शुगरने सर्वाधिक सात लाख ७७ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन केल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समाेर आले आहे.