शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

भूममध्ये ३१ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

भूम : यंदा तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी चाढ्यावर मूठ धरली असून, तालुक्यात ...

भूम : यंदा तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी चाढ्यावर मूठ धरली असून, तालुक्यात १५ जून अखेर ३१ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या हंगामात शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन या पिकास अधिक पसंती दिल्याचे सध्या सुरु आसलेल्या पेरण्यांवरुन दिसून येत आहे.

यंदा तालुक्यात महाबीजच्या बहुतांश बियाणाचा सुरूवातीपासूनच तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यात पुन्हा गतवर्षीचा पीक विमा न मिळाल्याने तसेच कोरोनामुळे आर्थिक अडचणही आहेच. सध्या उसनवारी करुन बी-बियाणाची जुळवाजुळव करत खरिपातून काहीतरी उत्पन्न हाती लागेल, या आशेने शेतकरी पेरणी करताना दिसत आहे.

तालुक्यात खरिपाचे ४९ हजार ३८६ हेक्टर क्षेत्र असून, गेल्या पाच-सहा दिवसापूर्वी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस प्रारंभ केला. सुरूवातीपासूनच सोयाबीनचा तुटवडा असल्याने मिळेल त्या कंपनीचे व घरगुती बियाणाची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात पाच मंडळापैकी अंबी मंडळात १३५.२० मिमी, याखालोखाल माणकेश्वर मंडळात ११८ मिमी तसेच भूम मंडळाच्या काही भागात पाऊस झाल्याने या भागात पेरण्या सुरु आहेत. वालवड व ईट मंडळात मात्र अद्याप पाऊस कमी असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र सरासरी ४९ हजार ३८६ हेक्टर असून, १५ जून अखेर १४ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या हंगामात ज्वारी ५३५.४५ हेक्टर, बाजरी १ हजार ६४७.९४ हेक्टर,, मका २५०० हेक्टर, तूर ९ हजार ७०० हेक्टर, उडीद ८ हजार २०० हेक्टर, मूग ३ हजार ५०० हेक्टर, तीळ ३५० हेक्टर, सोयाबीन १५ हजार ५०० हेक्टर, सूर्यफूल ५२३ हेक्टर, कारळे १०९ हेक्टर, तर कापूस ४ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. तालुक्यात यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी सध्या तरी उडीद पिकास पसंती दिली असून, याचे सरासरी क्षेत्र ८ हजार २०० हेक्टर असताना सध्या ४ हजार १०० हेक्टरवर म्हणजेच ५० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यापाठोपाठ सोयाबीन पिकास पसंती दिल्याचे दिसत आहे. यंदा कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ हजार ५३१ हेक्टर असले तरी आतापर्यंत केवळ १० हेक्टर म्हणजेच २२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी निखील रायकर यांनी दिली.