शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भूममध्ये ३१ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

भूम : यंदा तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी चाढ्यावर मूठ धरली असून, तालुक्यात ...

भूम : यंदा तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी चाढ्यावर मूठ धरली असून, तालुक्यात १५ जून अखेर ३१ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या हंगामात शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन या पिकास अधिक पसंती दिल्याचे सध्या सुरु आसलेल्या पेरण्यांवरुन दिसून येत आहे.

यंदा तालुक्यात महाबीजच्या बहुतांश बियाणाचा सुरूवातीपासूनच तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यात पुन्हा गतवर्षीचा पीक विमा न मिळाल्याने तसेच कोरोनामुळे आर्थिक अडचणही आहेच. सध्या उसनवारी करुन बी-बियाणाची जुळवाजुळव करत खरिपातून काहीतरी उत्पन्न हाती लागेल, या आशेने शेतकरी पेरणी करताना दिसत आहे.

तालुक्यात खरिपाचे ४९ हजार ३८६ हेक्टर क्षेत्र असून, गेल्या पाच-सहा दिवसापूर्वी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस प्रारंभ केला. सुरूवातीपासूनच सोयाबीनचा तुटवडा असल्याने मिळेल त्या कंपनीचे व घरगुती बियाणाची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात पाच मंडळापैकी अंबी मंडळात १३५.२० मिमी, याखालोखाल माणकेश्वर मंडळात ११८ मिमी तसेच भूम मंडळाच्या काही भागात पाऊस झाल्याने या भागात पेरण्या सुरु आहेत. वालवड व ईट मंडळात मात्र अद्याप पाऊस कमी असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र सरासरी ४९ हजार ३८६ हेक्टर असून, १५ जून अखेर १४ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या हंगामात ज्वारी ५३५.४५ हेक्टर, बाजरी १ हजार ६४७.९४ हेक्टर,, मका २५०० हेक्टर, तूर ९ हजार ७०० हेक्टर, उडीद ८ हजार २०० हेक्टर, मूग ३ हजार ५०० हेक्टर, तीळ ३५० हेक्टर, सोयाबीन १५ हजार ५०० हेक्टर, सूर्यफूल ५२३ हेक्टर, कारळे १०९ हेक्टर, तर कापूस ४ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. तालुक्यात यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी सध्या तरी उडीद पिकास पसंती दिली असून, याचे सरासरी क्षेत्र ८ हजार २०० हेक्टर असताना सध्या ४ हजार १०० हेक्टरवर म्हणजेच ५० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यापाठोपाठ सोयाबीन पिकास पसंती दिल्याचे दिसत आहे. यंदा कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ हजार ५३१ हेक्टर असले तरी आतापर्यंत केवळ १० हेक्टर म्हणजेच २२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी निखील रायकर यांनी दिली.