पेठसांगवी : उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथील वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वीजबिलाची वसुली केली जात असून, थकीत वीजबिलापोटी तब्बल २३० ग्राहकांचे वीज कनेक्शनही तोडण्यात आले आहे.
मार्चअखेरच्या नावाखाली वीज वितरण कंपनीने ही वसुली सुरू केली आहे. बिलभरणा नाही केला, तर कनेक्शन कट करण्यात येत असून, आतापर्यंत २३० ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले, तसेच विना कनेक्शन वीज वापरणाऱ्यांचे वायरही जप्त करण्यात आले. दरम्यान, महावितरणच्या या कारवाईमुळे काही ग्राहकांनी अर्धे पैसे जमा केले आहेत. ज्या ग्राहकांची रक्कम जास्त आहे, त्यांना अर्धे पैसे भरून सहकार्याची भावना दाखविण्यात येत आहे. यावेळी सास्तूर सबस्टेशनचे अरुण कुंभार, तानाजी सुभेदार, अजगर कादरी, ऋषिकेश शिंदे, अल्लाउद्दीन सय्यद, बाळू घोडके, इब्रान मळगे, अंतर शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी सरपंच सुमनताई सुभेदार म्हणाल्या, नागरिकांच्या हाताला कामे नाहीत. सध्या कोरोना महामारीत सर्वांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महावितरणने सक्तीने वसुली करू नये.