शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कामगारांना महिना एक हजार पेन्शन द्या; युवा स्वाभिमान पार्टीचे धरणे आंदोलन

By सूरज पाचपिंडे  | Updated: September 1, 2022 17:30 IST

शेतमजूर, कामगारांना कामगार मंडळाकडून एक हजार रुपये पेन्शन देण्यात यावी

उस्मानाबाद : शेतमजूर, कामगारांना कामगार मंडळाकडून प्रति महिना एक हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, शेतमजूर व कामगारांना दररोज काम मिळेलच याची शाश्वती नसते. परिणामी, त्यांना आर्थिक अडीअचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतमजूर, कामगारांना कामगार मंडळाकडून एक हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, विधवा महिलांना वृध्दपकाळ, संजय गांधी पेन्शनमध्ये वाढ करुन २ हजार रुपये प्रतिमहिना देण्यात यावी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीस व मुला-मुलींना महिन्याला ६०० रुपये मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, १५ वर्षापासून बंद असलेला तेरणा कारखाना शासनाने तात्काळ सुरु करावा, मराठा समाजाला मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने न्यायालयात ठोस बाजू मांडावी, आदी मागण्या लावून धरल्या होत्या. यावेळी युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मळगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagitationआंदोलन