शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेत १ कोटींचा घाेटाळा; तत्कालीन सहाय्यक बीडीओसह तिघांवर गुन्हा

By बाबुराव चव्हाण | Updated: May 5, 2023 10:37 IST

पाच गावांतील शाेषखड्ड्यांच्या कामात १ काेटी १२ लाखांचा गैरप्रकार

धाराशिव - धाराशिव पंचायत समितीअंतर्गत राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून पाच गावांमध्ये शाेषखड्ड्यांची कामे करण्यात आली. मात्र, या कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर चाैकशी करण्यात आली. चाैकशीअंती सुमारे १ काेटी १२ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. तत्कालीन सहाय्यक बीडीओंसह चाैघांवर गैरप्रकाराचा ठपका ठेवून अपहारित रक्कम शासनखाती जमा करण्याबाबत आदेशित केले. ताेवर संबंधितावर पाेलीस कारवाई करू नये, अशा सूचना हाेत्या. दरम्यान, संबंधितांनी केवळ ७५ लाख ७० हजार रूपये शासनखाती जमा केले. उर्वरित रक्कम न भरल्याने अखेर गुरूवारी रात्री उशिरा आनंदनगर पाेलीस ठाण्यात तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नाेंदविण्यात आला.

राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून धाराशिव तालुक्यातील खेड, मेडसिंगा, उपळा, ढाेकी आणि बेंबळी अशा पाच गावांमध्ये शाेषखड्ड्यांची कामे मंजूर करण्यात आली हाेती. मात्र, कामे न करताच पैसे लाटल्याची तक्रार झाल्यानंतर चाैकशीचे आदेश देण्यात आले हाेते. चाैकशीअंती सुमारे १ काेटी १२ लाखांचा गैरप्रकार झाल्याचे समाेर आले हाेते. हे पैसे संबंधितांनी मजुरांच्या खात्यावर जमा न करता आपल्या हितसंबंधातील लाेकांच्या नावे जमा करून अपहार केल्याा ठपका पंचायत समितीचे तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी एस. डी. तायडे, सहाय्यक लेखा अधिकारी आर. जे. लाेध, डाटाइंट्री ऑपरेटर व्ही. डी. राऊत यांच्यावर ठेवत प्रत्येकी ३७ लाख ४२ हजार रूपये एवढी रक्कम शासनखाती जमा करण्याचे निर्देश दिले हाेते. दरम्यान, प्रशासनाकडून पाेलीस कारवाईची तयारी सुरू असतानाच शासनाकडून रक्कम वसूल हाेईपर्यंत कारवाई करू नये, अशी सूचना पत्राद्वारे केली हाेती. दरम्यानच्या काळात तिघांनी मिळून ७५ लाख ७३ हजार रूपये शासनखाती जमा केले. मात्र, उर्वरित ३६ लाख ५८ हजारांचा भरणा केला नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक प्रकशासन अधिकारी संजय घाेंगडे यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून उपराेक्त तिघांविरूद्ध शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक यशवंत बारवकर यांच्याकडे साेपविण्यात आला आहे.

काेणत्या गावात किती लाखांचा घाेटाळा..?

खेड ग्रामपंचायतीअंतर्गत २० लाख ६७ हजार, मेडसिंगा १० लाख ५ हजार, उपळा ३३ लाख ९१ हजार, ढाेकी २५ लाख ७५ हजार तर बेंबळी ग्रामपंचायतीअंतर्गत २१ लाख ८८ हजारांचा गैरप्रकार झाला आहे. यापैकी ७५ लाख ७३ हजार रूपये एवढी अपहारित रक्कम तिघांनी मिळून शासनखाती जमा केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद