शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

रोजगार हमी योजनेत १ कोटींचा घाेटाळा; तत्कालीन सहाय्यक बीडीओसह तिघांवर गुन्हा

By बाबुराव चव्हाण | Updated: May 5, 2023 10:37 IST

पाच गावांतील शाेषखड्ड्यांच्या कामात १ काेटी १२ लाखांचा गैरप्रकार

धाराशिव - धाराशिव पंचायत समितीअंतर्गत राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून पाच गावांमध्ये शाेषखड्ड्यांची कामे करण्यात आली. मात्र, या कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर चाैकशी करण्यात आली. चाैकशीअंती सुमारे १ काेटी १२ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. तत्कालीन सहाय्यक बीडीओंसह चाैघांवर गैरप्रकाराचा ठपका ठेवून अपहारित रक्कम शासनखाती जमा करण्याबाबत आदेशित केले. ताेवर संबंधितावर पाेलीस कारवाई करू नये, अशा सूचना हाेत्या. दरम्यान, संबंधितांनी केवळ ७५ लाख ७० हजार रूपये शासनखाती जमा केले. उर्वरित रक्कम न भरल्याने अखेर गुरूवारी रात्री उशिरा आनंदनगर पाेलीस ठाण्यात तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नाेंदविण्यात आला.

राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून धाराशिव तालुक्यातील खेड, मेडसिंगा, उपळा, ढाेकी आणि बेंबळी अशा पाच गावांमध्ये शाेषखड्ड्यांची कामे मंजूर करण्यात आली हाेती. मात्र, कामे न करताच पैसे लाटल्याची तक्रार झाल्यानंतर चाैकशीचे आदेश देण्यात आले हाेते. चाैकशीअंती सुमारे १ काेटी १२ लाखांचा गैरप्रकार झाल्याचे समाेर आले हाेते. हे पैसे संबंधितांनी मजुरांच्या खात्यावर जमा न करता आपल्या हितसंबंधातील लाेकांच्या नावे जमा करून अपहार केल्याा ठपका पंचायत समितीचे तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी एस. डी. तायडे, सहाय्यक लेखा अधिकारी आर. जे. लाेध, डाटाइंट्री ऑपरेटर व्ही. डी. राऊत यांच्यावर ठेवत प्रत्येकी ३७ लाख ४२ हजार रूपये एवढी रक्कम शासनखाती जमा करण्याचे निर्देश दिले हाेते. दरम्यान, प्रशासनाकडून पाेलीस कारवाईची तयारी सुरू असतानाच शासनाकडून रक्कम वसूल हाेईपर्यंत कारवाई करू नये, अशी सूचना पत्राद्वारे केली हाेती. दरम्यानच्या काळात तिघांनी मिळून ७५ लाख ७३ हजार रूपये शासनखाती जमा केले. मात्र, उर्वरित ३६ लाख ५८ हजारांचा भरणा केला नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक प्रकशासन अधिकारी संजय घाेंगडे यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून उपराेक्त तिघांविरूद्ध शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक यशवंत बारवकर यांच्याकडे साेपविण्यात आला आहे.

काेणत्या गावात किती लाखांचा घाेटाळा..?

खेड ग्रामपंचायतीअंतर्गत २० लाख ६७ हजार, मेडसिंगा १० लाख ५ हजार, उपळा ३३ लाख ९१ हजार, ढाेकी २५ लाख ७५ हजार तर बेंबळी ग्रामपंचायतीअंतर्गत २१ लाख ८८ हजारांचा गैरप्रकार झाला आहे. यापैकी ७५ लाख ७३ हजार रूपये एवढी अपहारित रक्कम तिघांनी मिळून शासनखाती जमा केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद