शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करण्यासाठी गेला तरुण; तब्बल २०० पायऱ्या चढून पोलिसांनी वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 20:15 IST

Suicide Attempt :मुंबईतील २७ वर्षीय व्यावसायिक तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता.

ठळक मुद्देपोलिसांना पोहोचण्यात पाच मिनिटे जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता.

नालासोपारा : प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करण्यासाठी वालीव येथील एका टेकडीवर गेलेल्या तरुणाला दोन पोलिसांनी तब्बल २०० पायऱ्या चढून वाचवले. पोलिसांनी मोबाईलवर बोलण्यात व्यस्त ठेवून नंतर त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून घरच्यांच्या ताब्यात दिले आहे.

मुंबईतील २७ वर्षीय व्यावसायिक तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने दुसरे लग्न केले. यामुळे हा तरुण निराश झाला आणि शनिवारी सकाळी आत्महत्या करण्यासाठी वसई पूर्वेच्या भागवत टेकडीवर गेला. ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळताच सकाळी सव्वाअकरा वाजता वालीव पोलिसांना कळवले. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. हा तरुण ज्या टेकडीवर होता ती टेकडी अडीच हजार फूट उंचीवर होती. बळीद आणि गायकवाड यांनी त्याला फोनवर बोलण्यात गुंगवून ठेवले आणि त्याला आत्महत्या करण्यपासून रोखले. पोलिसांना पोहोचण्यात पाच मिनिटे जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता. यावेळी त्याच्याशी बोलत राहणे, धीर देणे गरजेचे होते. आम्ही त्याला बोलण्यात व्यस्त ठेवले, अशी माहिती पोलीस नाईक सचिन बळीदने दिली. हा तरुण व्यावसायिक असून त्याची वसईत कंपनी आहे.

दोन पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या तरुणाला बोलण्यात व्यस्त ठेवले. सुमारे दोनशे पायऱ्यावर चढून त्या तरुणाला वाचवले. - राहुल पाटील, पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट