शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परिचितांकडूनच होतोय महिलांवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 06:22 IST

बलात्कारातील ९५ टक्के आरोपी ओळखीतले; तीन वर्षांत १४ हजार ७७ आरोपींना अटक

जमीर काझी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्याहून सरस कामगिरी महिलांकडून होत असताना राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. विशेष म्हणजे बहुतांश पीडितांना त्यांच्या माहितीतील विकृताकडून अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांत तीन वर्षांत पोलिसांनी १४ हजार ७७ जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ९५ टक्क्यांहून अधिक म्हणजे तब्बल १३,७३२ आरोपी हे फिर्यादीच्या परिचितांपैकीच आहेत.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांपैकी काही नात्यातील तर काही मित्र असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. महाराष्टÑात ३ वर्षांत राज्यातील विविध ४६ पोलीस घटकांमध्ये बलात्काराचे १३ हजार ३३२ गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकरणी पोलिसांनी एकूण १४ हजार ७७ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये केवळ ३४५ जणांना पीडिता ओळखत नव्हत्या. अन्य सर्व १३ हजार ७३२ आरोपी त्यांच्या नित्य पाहणीतील होते. तर, काही प्रकरणांमध्ये अनेक वर्षांपासून परिचयातील होते. बेसावध असताना त्यांच्यावर बळजबरी करण्यात आली.काही आरोपी हे पीडितांचे पूर्वाश्रमीचे मित्र होते; मात्र काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी बदला घेण्यासाठी बळजबरी केल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.

यामध्ये काही गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर विकृतांनी तक्रार मागे घेण्यासाठी विविध माध्यमांतून दबाव टाकल्याच्या तक्रारीही दाखल झाल्या आहेत. तर काही प्रकरणांमध्ये दबावाला बळी पडून फिर्यादीकडून न्यायालयात व न्यायालयाबाहेर तडजोडी करून गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. (समाप्त)तपासादरम्यान फसवणुकीचे कलमबलात्कार, विनयभंग प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये पीडितांकडून आरोपीशी भांडण, मतभेद झाल्याने गुन्हे दाखल केल्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे न्यायालयात टिकत नाहीत. तपासादरम्यान भादंवि कलम ३७६, ३०७ ही कलमे हटवून फसवणुकीचे म्हणजे भादंवि ४२० हे कलम लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारMolestationविनयभंग