शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

परिचितांकडूनच होतोय महिलांवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 06:22 IST

बलात्कारातील ९५ टक्के आरोपी ओळखीतले; तीन वर्षांत १४ हजार ७७ आरोपींना अटक

जमीर काझी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्याहून सरस कामगिरी महिलांकडून होत असताना राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. विशेष म्हणजे बहुतांश पीडितांना त्यांच्या माहितीतील विकृताकडून अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांत तीन वर्षांत पोलिसांनी १४ हजार ७७ जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ९५ टक्क्यांहून अधिक म्हणजे तब्बल १३,७३२ आरोपी हे फिर्यादीच्या परिचितांपैकीच आहेत.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांपैकी काही नात्यातील तर काही मित्र असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. महाराष्टÑात ३ वर्षांत राज्यातील विविध ४६ पोलीस घटकांमध्ये बलात्काराचे १३ हजार ३३२ गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकरणी पोलिसांनी एकूण १४ हजार ७७ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये केवळ ३४५ जणांना पीडिता ओळखत नव्हत्या. अन्य सर्व १३ हजार ७३२ आरोपी त्यांच्या नित्य पाहणीतील होते. तर, काही प्रकरणांमध्ये अनेक वर्षांपासून परिचयातील होते. बेसावध असताना त्यांच्यावर बळजबरी करण्यात आली.काही आरोपी हे पीडितांचे पूर्वाश्रमीचे मित्र होते; मात्र काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी बदला घेण्यासाठी बळजबरी केल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.

यामध्ये काही गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर विकृतांनी तक्रार मागे घेण्यासाठी विविध माध्यमांतून दबाव टाकल्याच्या तक्रारीही दाखल झाल्या आहेत. तर काही प्रकरणांमध्ये दबावाला बळी पडून फिर्यादीकडून न्यायालयात व न्यायालयाबाहेर तडजोडी करून गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. (समाप्त)तपासादरम्यान फसवणुकीचे कलमबलात्कार, विनयभंग प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये पीडितांकडून आरोपीशी भांडण, मतभेद झाल्याने गुन्हे दाखल केल्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे न्यायालयात टिकत नाहीत. तपासादरम्यान भादंवि कलम ३७६, ३०७ ही कलमे हटवून फसवणुकीचे म्हणजे भादंवि ४२० हे कलम लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारMolestationविनयभंग