शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

परिचितांकडूनच होतोय महिलांवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 06:22 IST

बलात्कारातील ९५ टक्के आरोपी ओळखीतले; तीन वर्षांत १४ हजार ७७ आरोपींना अटक

जमीर काझी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्याहून सरस कामगिरी महिलांकडून होत असताना राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. विशेष म्हणजे बहुतांश पीडितांना त्यांच्या माहितीतील विकृताकडून अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांत तीन वर्षांत पोलिसांनी १४ हजार ७७ जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ९५ टक्क्यांहून अधिक म्हणजे तब्बल १३,७३२ आरोपी हे फिर्यादीच्या परिचितांपैकीच आहेत.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांपैकी काही नात्यातील तर काही मित्र असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. महाराष्टÑात ३ वर्षांत राज्यातील विविध ४६ पोलीस घटकांमध्ये बलात्काराचे १३ हजार ३३२ गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकरणी पोलिसांनी एकूण १४ हजार ७७ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये केवळ ३४५ जणांना पीडिता ओळखत नव्हत्या. अन्य सर्व १३ हजार ७३२ आरोपी त्यांच्या नित्य पाहणीतील होते. तर, काही प्रकरणांमध्ये अनेक वर्षांपासून परिचयातील होते. बेसावध असताना त्यांच्यावर बळजबरी करण्यात आली.काही आरोपी हे पीडितांचे पूर्वाश्रमीचे मित्र होते; मात्र काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी बदला घेण्यासाठी बळजबरी केल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.

यामध्ये काही गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर विकृतांनी तक्रार मागे घेण्यासाठी विविध माध्यमांतून दबाव टाकल्याच्या तक्रारीही दाखल झाल्या आहेत. तर काही प्रकरणांमध्ये दबावाला बळी पडून फिर्यादीकडून न्यायालयात व न्यायालयाबाहेर तडजोडी करून गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. (समाप्त)तपासादरम्यान फसवणुकीचे कलमबलात्कार, विनयभंग प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये पीडितांकडून आरोपीशी भांडण, मतभेद झाल्याने गुन्हे दाखल केल्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे न्यायालयात टिकत नाहीत. तपासादरम्यान भादंवि कलम ३७६, ३०७ ही कलमे हटवून फसवणुकीचे म्हणजे भादंवि ४२० हे कलम लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारMolestationविनयभंग