शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

गायीबद्दल तक्रार दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 06:11 IST

सार्वजनिक ठिकाणी मंदिरासमोर गायीला बांधून उदरनिर्वाह करीत असलेल्या महिलेबाबत एका प्राणिप्रेमीने पोलिसात तक्रार दिली. यामुळे उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करीत या महिलेने औषधांच्या अतिरिक्त गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी घाटकोपर परिसरात घडली.

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी मंदिरासमोर गायीला बांधून उदरनिर्वाह करीत असलेल्या महिलेबाबत एका प्राणिप्रेमीने पोलिसात तक्रार दिली. यामुळे उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करीत या महिलेने औषधांच्या अतिरिक्त गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी घाटकोपर परिसरात घडली. सीमा अनिल चव्हाण (३०, रा. पंतनगर) असे या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध राखी कोठारी यांनी तक्रार दिली होती. चव्हाण यांनी कोठारी यांच्याच घरासमोर पित्तशामक गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केले. चव्हाण यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.सीमा चव्हाण यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण या टिळक रोड परिसरातील बालाजी मंदिरच्या रस्त्यावर गाय बांधतात. गायीला भाविकांकडून दिला जाणारा चारा विकून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. हे निदर्शनास येताच याच परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेत कार्यरत राखी कोठारी यांनी चव्हाण यांच्याविरोधात देवनार पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकारी डॉ. शिवाली गंगावणे यांच्याकडे तसेच पोलीस ठाण्यातही तक्रार दिली होती. त्यामुळे चव्हाण यांच्यावर उपासमारीची वेळ आली.गेल्या पंधरा दिवसांपासून त्या परिसरातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांकडे मदतीसाठी प्रयत्न करीत होत्या. मात्र कोणाकडूनही सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी अखेर कोठारी यांनाच विनंती केली. त्या वेळी गायीच्या आरोग्याची होणारी हेळसांड थांबविणे हाच हेतू असल्याचे कोठारी यांनी सांगितले. त्यामुळे हताश चव्हाण यांनी शनिवारी कोठारी यांच्या घरासमोर जाऊन गोळ्यांचे सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या बेशुद्ध पडल्यानंतर तेथील रिक्षा चालकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले.पंतनगरच्या वरिष्ठ निरीक्षक रोहिणी काळे म्हणाल्या, ‘सार्वजनिक रस्त्यावर कचरा करणे चुकीचे आहे, कोणी भाविक तेथे गेल्यावर त्याच्याकडून पैसे घेऊन चारा देणे हा क्रूरपणा आहे. आम्ही यासंदर्भातील तक्रारीची चौकशी करीत आहोत.तक्रारीनुसार कारवाईदेवनार कत्तलखान्यातील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाली गंगावणे यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे संपूर्ण मुंबईतून तक्रारी येतात. कोणी व्हिडीओ, फोटो आणि मेसेज पाठवतात. त्यानुसार आम्ही जनावरे ताब्यात घेऊन कारवाई करतो. तक्रार कोणीही केली तरी त्याबाबत योग्य ते पाऊल उचलण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे कारवाई होतेच.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई