शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:08 IST

पोलिसांनी कसून तपास सुरू केला तेव्हा भुवनेश्वर येथे शुभमित्रासोबत अखेरचं दीपकला पाहिले होते असं पुढे आले

भुवनेश्वर - शहरातील वाहतूक विभागातील एका महिला कॉन्स्टेबलच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य पोलिसांनी उलगडले आहे. ६ सप्टेंबरपासून महिला कॉन्स्टेबल शुभमित्रा साहू बेपत्ता होती. पोलिसांनी केलेल्या तपासात शुभमित्राची हत्या झाली असून तिचा पती दीपक कुमार राऊतने ही हत्या केल्याचं समोर आले. दीपक हादेखील पोलीस शिपाई आहे. हत्येनंतर दीपकने शुभमित्राचा मृतदेह त्याच्या कारमध्ये लपवला होता. त्यानंतर रोजप्रमाणे तो कामाला गेला. संधी मिळताच त्याने १७० किमी अंतरावर निर्जन स्थळी जंगलात शुभमित्राचा मृतदेह दफन केला होता. 

शुभमित्राच्या गायब झाल्यानंतर तो दुखी असल्याचा दिखावा करत होता. तिचे कुटुंब आणि पोलिसांच्या मदतीने दीपक तिला शोधण्याचं नाटकही करत होता. शुभमित्रा सुरक्षित परत यावी यासाठी त्याने मंदिरात पूजाही केली. पिचुकली येथील रहिवासी असलेली शुभमित्रा ६ सप्टेंबरला तिच्या ड्युटीवर गेली होती. परंतु संध्याकाळी ७ वाजता ती घराकडे निघाली परंतु घरीच पोहचली नाही. ती घरी न परतल्याने कुटुंबाने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस शुभमित्राचा शोध घेत राहिली परंतु हाती काहीच लागले नाही.

त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला तेव्हा भुवनेश्वर येथे शुभमित्रासोबत अखेरचं दीपकला पाहिले होते असं पुढे आले. त्याला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस अधिकारी म्हणाले की, दीपकवर आमचा संशय तेव्हा वाढला, जेव्हा आम्हाला मागील वर्षी दीपक आणि शुभमित्राने कोर्ट मॅरेज केल्याचे तपासात उघड झाले. याबाबत दोघांच्याही कुटुंबाला माहिती नव्हती. दोघांनी लग्न केले  होते परंतु एकत्र राहत नव्हते. त्यामुळे या दोघांच्या नात्यातील गूढ आणखी वाढले. ६ सप्टेंबरला ती बेपत्ता झाली त्याबाबत दीपकची चौकशी केली तेव्हा त्या दोघांचे नाते ठीक सुरू होते असा दावा त्याने केला. शुभमित्रा तिच्या आई वडिलांशी भांडून घर सोडून गेली असेल असं सांगत त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 

मोबाईलमधून सुगावा सापडला...

पोलीस तपासात शुभमित्राचा फोन अनलॉक करून तिचे व्हॉट्सअप चॅट पाहिले त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. दीपक आणि शुभमित्रा यांच्यात आर्थिक वाद सुरू होता. शुभमित्राने दीपककडून १० लाख रूपये उधार घेतले होते. दोघांमध्ये या गोष्टीवरून तणाव सुरू होता. शुभमित्रा तणावात होती, तिने मथुरा, वाराणसी अथवा एखाद्या आध्यात्मिक स्थळी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोलिसांनी दीपकची पॉलीग्राफ चाचणी केली त्यात त्याची उत्तरे दिशाभूल करणारी असल्याचं समोर आले. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. 

दीपकने सांगितले सत्य

चौकशीत दीपकने कबूल केले की, ६ सप्टेंबरला शुभमित्राला होंडा सिटी कारने तिला घेऊन गेलो, दुपारी २- ३ च्या दरम्यान तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कारच्या डिक्कीत लपवून दिवसभर काम करत होतो. दुसऱ्या दिवशी मृतदेह जंगलात दफन केला. पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी जात शुभमित्राचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर या गुन्ह्यात आरोपी दीपक राऊतला अटक करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी