शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

लॉकडाऊनमुळे पत्नी अडकली माहेरीच! घरात घेण्यास पतीचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 02:20 IST

महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनदरम्यान घाटकोपरमध्ये माहेरी अडकलेल्या पत्नीला कांदिवलीत राहणाऱ्या पतीने कोरोनाचे कारण पुढे करत घरात घेण्यास, तसेच दोन मुलींना भेटण्यास मज्जाव केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तिने राष्ट्रीय महिला आयोगात धाव घेतल्यानंतर समतानगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.

पीडित महिलेचे लग्न १ जून, २००३ रोजी नामांकित एअरवेज कंपनीत काम करणाºया व्यक्तीसोबत झाले. सध्या ती कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेजमध्ये पती व तेरा आणि पंधरा वर्षांच्या मुलीसह राहत होती. ती घाटकोपरमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सांभाळते जे पूर्वी कांदिवलीत होते. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, या कार्यालयाची १२ मार्च, २०२० रोजी डागडुजी सुरू करण्यात आली होती. १९ मार्च, २०२० रोजी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने २२ मार्च, २०२० पर्यंत घाटकोपर बंद केले.

कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम अर्धवट राहिल्याने महिलेने कांजूरमार्ग या ठिकाणी असलेल्या तिच्या माहेरी राहण्यास सुरुवात केली. तिच्या पतीने फेब्रुवारी, २०२० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यामुळे महिला त्याच्याशी संभाषण करीत नव्हती. मात्र नंतर तिने प्रयत्न करूनही तिच्या मुलींशी तिचा संपर्क झाला नाही. दरम्यान, लॉकडाऊनही दोन महिने वाढला. त्यामुळे अखेर मे, २०२० रोजी ती घरी परतली ज्यावर तिचाही मालकी हक्क आहे. मात्र तिच्या पतीने सोसायटीला सांगून तिला १४ दिवस क्वॉरंटाइन होण्यास सांगितले. तसेच तिला कोरोना चाचणी करून येण्यास सांगितली. क्वॉरंटाइन राहिल्यावरही त्याने तिला घरात घेण्यास नकार दिला. पोटच्या पोरींना भेटू दिले नाही.

कोर्टातून ऑर्डर आण असेही पत्नीला सांगितले. याची माहिती तिने वेळोवेळी समतानगर पोलिसांना दिली आणि त्यांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतल्याचे तिने जबाबात म्हटले आहे. २५ जून, २०२० रोजी मात्र तिने तिच्याजवळील बनावट चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळीही तिला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याने केला. तसेच घरात जेवण लपवून ठेवणे, लायटर लपविणे, झोपल्यावर पंखा बंद करणे असे प्रकार सुरू केले. याला कंटाळून अखेर ती बाहेर पडली आणि तिने वकिलांच्या मदतीने राष्ट्रीय महिला आयोगात धाव घेत नंतर समतानगर पोलिसात दखलपात्र गुन्हा दाखल करवला. वंशाच्या दिव्यासाठी छळ! पीडित महिलेला दोन मुली आहेत. मात्र तिचा पती व त्याच्या घरच्यांना ‘वंशाचा दिवा’ म्हणून मुलगा हवा होता. दुसºया मुलीच्या जन्मापासून तिला सासरच्याकडून मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली होती, असेही तिच्या जबाबात नमूद आहे.आणि तक्रार दाखल झालीपीडित महिलेला होणाºया त्रासाबाबत आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या आणि अखेर समतानगर पोलिसांनी याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली.- अ‍ॅड्. विशाल सत्यप्रकाश सक्सेना, पीडितेचे वकील

टॅग्स :Policeपोलिस