शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अभिनेत्यांमागेच का पोलिसांचा ससेमिरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 05:51 IST

ड्रग प्रकरण : चित्रपट उद्योगांतून प्रतिक्रिया

बंगळुरू : अमलीपदार्थाचे सेवन आणि कारभाराविरुद्ध पोलिसांनी कन्नड चित्रपट उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला असून आतापर्यंत दोन अभिनेत्रींसह १३ जणांना अटक केली आहे. या प्रकरणावरून कन्नड चित्रपट उद्योगांतून पोलिसांविरुद्ध प्रतिक्रिया उमटत आहे. पोलिसांचा फक्त अभिनेते, अभिनेत्रींच्याच मागे ससेमिरा का? राजकारण्यांविरुद्ध का नाही? असा सवाल केला जात आहे.चित्रपट उद्योगातील लोकांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याने खरे गुन्हेगार सुटू शकतात, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.सामाजिक घडी बिघडविण्यास महिलाच अधिक जबाबदार असतात, हा गैरसमज धोकादायक आहे, असे अभिनेता चेतन अहिंसाने म्हटले आहे.अभिनेत्री शर्मिला मांद्रेचे नावही टीव्हीवरील एका वृत्तात घेण्यात आले होते. या निराधार आरोपांनी आणि ड्रग प्रकरणाशी माझा संबंध जोडल्याने मी खूप व्यथित झाले. तिने अलीकडेच सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ४ एप्रिल रोजीच्या कार अपघाताबाबत माझ्याविरुद्ध चुकीचे आरोप करण्यात आले. या अपघातात त्या जखमी झाल्या होत्या. माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून मी बंगळुरू सिटी सिव्हिल कोर्टात धाव घेतली. कोर्टाने माझ्याविरुद्ध चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसिद्ध करण्यास मनाई केली.अभिनेत्री परुल यादवने म्हटले की, अधिक प्रसिद्धी मिळविण्यासाठी खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी महिलांना लक्ष्य करून त्यांची नावे ड्रग प्रकरणात गोवली जातात. फक्त महिलांचीच नावे बाहेर का येत आहेत. एकही पुरुष अभिनेता किंवा राजकीय नेत्यांच्या मुलांचा यात समावेश नसावा, हे पटण्यासारखे नाही.अभिनेत्रींच्या खाजगी जीवनाबाबतच चौकशी का केली जाते, हेही मला उमजत नाही. अशा प्रकारे चौकशी होत असेल, तर व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवावा? चित्रपट क्षेत्रातील काही जण दबावामुळे ड्रग्ज घेतही असतील; परंतु अशांची संख्या नगण्य आहे, असेही पारूल यादवने म्हटले आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ