शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

फेसबुक पोस्ट का टाकली?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 19:45 IST

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्याच्या आवारात तरुणाला बेदम मारहाण फेसबुकवर पोस्ट का टाकली आव्हाडांनी विचारला जाब, साध्या वेषातील पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

ठाणे : फेसबुकवर पोस्ट का टाकली? असा जाब विचारीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला काठी तुटेपर्यंत बेदम मारहाण झाल्याचा आरोप ठाण्याच्या कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुले (40) या अभियंत्याने केला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

करमुले यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 5 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजण्याच्या सुमारास दोन साध्या वेषातील तर दोघे वर्दीवरील पोलीस त्यांच्या कावेसर येथील घरी आले. त्यांनी कोणतेही कारण न सांगता पोलीस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली बाहेर येण्यास फर्मावले. कारण विचारल्यानंतर मात्र दहा मिनिटांमध्ये आणून सोडतो, असे त्यांच्या पत्नीला सांगण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईलही हिसकावून घेत एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेण्यात आले. 

तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या 15 ते 20 जणांनी पोलिसांकडे असणारी फायबर काठी तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर आणि मांडयांवर जबर मारहाण केली. त्यानंतरही  लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यावेळी डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागणार नाही, याची दक्षता घ्या, असेही घेऊन येणारे पोलीस त्याठिकाणी बजावत होते. त्यानंतर आव्हाड यांनी जखमी अवस्थेत असलेल्या करमुले यांना फेसबुकवर पोस्ट का टाकली, अशी विचारणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अतिउत्साहात आणि भावनेच्या भरात ही पोस्ट टाकली, असे सांगत त्यांनी माफीही मागितली. त्यानंतर तिथे असलेल्या एका कार्यकर्त्याच्या मोबाईलवरुन करमुले यांनी घरी फोन करुन फेसबुकवरील ती पोस्ट काढण्यास त्यांच्या पत्नीला सांगितले. 

हे संपल्यानंतरही त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. ‘मी ही पोस्ट चुकून केली आहे. त्याबद्दल माफी मागतो,’  असा व्हिडीओ देखिल रेकॉर्ड करुन घेण्यात आल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मारहाण झाल्यानंतर कथित पोलिसांनीच या तरुणाला रुग्णालयात नेले. तिथे उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले. या सर्व प्रकारानंतर करमुले यांनी वर्तकनगर पोलीस ठाणे गाठून याबाबत अपहरण, दंगल माजविणो, मारहाण करणो आणि धमकी दिल्याची तक्रार अनोळखी व्यक्तीविरुद्ध दाखल केली आहे. दरम्यान, करमुले यांच्याविरुद्धही वर्तकनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

कशामुळे घडला प्रकार?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी  दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रीयेनंतर करमुले यांनी आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे. यातूनच हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे बोलले जाते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही ते प्रतिक्रीया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. 

ही मोगलाई आहे का शिवशाही- डावखरेकोरोना राहू द्या, आधी मंत्री आव्हाड यांच्यापासून वाचवा! कॉमेंट करणाऱ्या सामान्य ठाणेकर नागरिकाला आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये मारहाण झाली आहे. ही मोगलाई आहे की शिवशाही असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्वीटद्वारे केला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेPoliceपोलिस